HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यशासन नेहमीच सकारात्मक !

अकोला | “मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यशासन नेहमीच सकारात्मक आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अजूनपर्यंत शासनाकडे आलेला नाही. पुढील पंधरा दिवसात राज्य मागासवर्ग आयोगाचा अर्ज शासनाकडे सादर होईल,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. अकोल्यातील संभाव्य दुष्काळ आणि विविध विकासकामांच्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल. या अहवालासंदर्भात माध्यमांकडून अनेक चुकीच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. या अहवालात काय मुद्दे असू शकतील याचा अंदाज लावून अहवालच मिळाल्यासारखी मांडणी माध्यमांकडून करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आता कळले ठाकरे सरकारमधील काही मंत्री…”, नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

News Desk

संजय राऊतांसह रामदास कदम राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

Aprna