HW News Marathi
राजकारण

अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर कोणालाही आनंद होण्याचे कारण नाही !

मुंबई। नरभक्षक अवनी वाघिणीची शिकार केल्यानंतर भाजप सरकारवर सर्व स्तरातून टीका होत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांना प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारले असता. मुख्यमंत्र्यांनी सावध भूमिका घेत म्हटले की “वाघिणीच्या मृत्यूवरून कोणालाही आनंद होण्याचे कारण नाही. उलट सर्वंना दु:खच झाले आहे. अवनीच्या मृत्यूबाबत आता काहीजण आक्षेप नोंदवत आहेत. मात्र, वाघिणीने हल्ला केल्यानंतर बचावासाठी झालेल्या गोळीबारात ती मारली गेली असेही कारण पुढे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आधी तिला बेशुद्ध करून पकडावे आणि त्यानंतर तिचे पुनर्वसन करावे असा नियम आहे. परंतु त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती ते तपासून बघावे लागेल”,असे फडणवीस यांनी सांगितले आहे.

केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी केलेल्या टीकेनंतर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मेनका गांधी या सुरुवातीपासूनच प्राणीप्रेमी आहेत.अनेकदा त्या मला यासंदर्भात फोन करत असतात. प्राण्यांबाबतचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत त्या माझ्याकडे पाठपुरावा करत असतात. त्यांनी तीव्र शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मतदान करणे हे आपले कर्तव्य, सर्वांनी आपले कर्तव्य बजावण्याची गरज | मोहन भागवत

News Desk

यापुढे युती नाही | उद्धव ठाकरे

News Desk

खडसे, दमानिया वाद पुन्हा चव्हाट्यावर

News Desk