HW News Marathi
मुंबई

पोलिसांनी घटना वाचण्याची गरज | निखिल वागळे

मुंबई | आज मुंबईत संविधान सन्मान यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. ही यात्रा वीर कोतवाल उद्यान ते चैत्यभूमी अशी काढण्यात येणार होती. पण पोलिसांनी या यात्रेला परवानगी नाकारली. त्यामुळे ही यात्रा चैत्यभूमी येथे घेण्यात आली. यावेळी निखिल वागळे यांनी पोलिसांवर टीका केली. ते म्हणाले, पोलिसांनी मिरवणुकीला परवानगी नाकारली हे अत्यंत चुकीच आहे. पोलीस कायद्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करतात. पोलिसांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे हे राज्य घटनेनुसार चालते. त्यांच्या वर्दीनुसार चालत नाही. पोलिसांचा मी निषेध करतो.पोलिसांनी घटना वाचण्याची गरज आहे.

पुढे म्हणाले, शांतपणे आंदोलन करण्याचा अधिकार नागरिकांना घटनेने दिला आहे. या विभागाचे डीसीपी असतील त्यांनी घटना वाचा कायदा वाचा, तुमची पोलिसी वृत्ती सर्व सामान्य नागरिकांवर दाखवू नाका. मेळावे आणि राजकीय मोर्च्याला परवानगी दिली जाते. पण बाबासाहेबांनी घटना लिहली, त्या बाबासाहेबांच्या चैत्यभूमीत अंगणात यायला आम्हाला पोलिसांची परवानगी मिळत नाही. ही एनएपीएम ने काढलेली संविधान सन्मान यात्रा आहे. आणि ती दांडी पासून दिल्लीला जाणार आहे. आणि मी अशासाठी सामील झालो आहे. संविधान वाचवण्याचा कार्यकर्त्यांचा एक प्रयत्न आहे. आणि माझ्या मते तो महत्वाचा आहे. महत्वाचा अशासाठी की संविधानावर काही ना काही मार्गाने हल्ला होतोय.

सरकारकडून होतोय, पोलिसांकडून होतोय तरी शेतकऱ्यांवर लाठीमार केला जातोय. कधी कामगारांना तुरुंगात टाकले जाते. कधी मानवी हक्क कार्यकर्त्यांना युएपीए लावून जेलमध्ये टाकले जाते. त्यामुळे संविधान वाचवणं महत्वाचं आहे. आणि नागरी स्वातंत्र्याच्या बाजूने मी कायम उभाराहिलो आहे. म्हणून इथे मी पाठींबा द्यायला आलो आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

येत्या ४८ तासात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

News Desk

ठाकरे गटाच्या BMC कार्यालयावर शिंदे गटाचा दावा; दोन्ही गटाचे नेते आमने-सामने

Aprna

जनाची नाही तर मनाची लाज बाळगून आपल्या महापौरपदाचा राजीनामा द्या !

News Desk
क्रीडा

प्रवीण कुमारची आज क्रिकेटमधून निवृत्ती

News Desk

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट टीमचा गोलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या एका खेळाडूने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी क्रिकेटमधून निवत्त झाला असला तरी ही त्याला तरी भविष्यात त्याला आपण प्रशिक्षक व्हावे, असे वाटत आहे.

भारतासाठी तब्बल 13 वर्षे प्रवीण कुमार क्रिकेट खेळला असून सध्याच्या घडीला त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळत नसल्याने त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना प्रवीण कुमार हा भारताचा मुख्य गोलंदाज होता. भारताच्या गोलंदाजीचे जोरदार कामगिरी करत असे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये मात्र त्याला भारतीय संघात संधी मिळालेली नव्हती.

प्रवीण कुमारने त्यांनी ट्विटकरुन निवृत्ती जाहीर केली आहे. निवृत्तीबाबत प्रवीण म्हणाला की, ” मी निवृत्ती घेतली असली तरी त्याबाबत मला वाईट वाटत नाही. कारण मी मनापासून क्रिकेट खेळलो. खेळाशी प्रतारण मी कधीही केली नाही. त्यामुळे निवृत्ती घेत असताना माझ्या मनाला कसलीही बोच नाही. बरेच युवा गोलंदाज तयार होत आहेत. त्यांना संधी मिळावी, म्हणून मी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. “

 

Related posts

सचिन तेंडुलकरचे गुरू रमाकांत आचरेकर यांचे निधन

News Desk

भारतीय मुलाने बुद्ध्यांक परीक्षेत आइनस्टाइनला टाकले मागे

News Desk

सानिया मिर्झा-शोएब मलिक यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

swarit