HW News Marathi
महाराष्ट्र

विजयादशमीला शस्त्रपूजन करणारच | संघ

नागपूर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे बेकायदेशीर शस्त्रसाठा असल्याचा गंभीर आरोप ११ आॅक्टोबर रोजी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यामुळे संघ या दसऱ्याला शस्त्रपूजा करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परंपरेनुसार दसऱ्याला शस्त्रपूजन करणारच असल्याचे ठामपणे सांगितले आहे. “स्वयंसेवक संघाकडे असलेला बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त करावा. पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त न केल्यास आम्ही न्यायालयात जाऊ”, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता.

विजयादशमीला अवघा एक दिवस राहिलेला असताना प्रकाश आंबेडकर यांनी हा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला आहे. “विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात येणाऱ्या शस्त्रपूजेवर आमचा आक्षेप नाही. परंतु संघाकडे असलेली ही शस्त्रे नेमकी कोणाची आहेत तसेच या शस्त्रांचा परवाना आहे का ?”, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करीत ” भारतीय संस्कृतीत विजयादशमीच्या दिवशी शस्त्र किंवा उपकरणांची पूजा करण्याला मोठे महत्त्व आहे. ही भारतीय परंपरा आहे. त्यामुळे विजयादशमीच्या उत्सवातही शस्त्रपूजन होणारच,'” असे नागपूर येथील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘वडेट्टीवार साहेब तुमच्या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात जावं लागेल’, मनसेची उपरोधिक टीका

News Desk

मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळवी, यासाठी दिल्लीत महाआरती करणार, राणा दाम्पत्याची घोषणा

Aprna

मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, बाळा नांदगावकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

News Desk
मनोरंजन

स्मिता पाटील बातमीदार ते संवेदनशील अभिनेत्री एक प्रवास

News Desk

मी रात टाकली, मी कात टाकली

मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली..

जेव्हा जेव्हा चित्रपट क्षेत्रातील संवेदनशील अभिनेत्रीचं नाव येते. त्यावेळी स्मिता पाटील यांचं नाव आवर्जून घेतलं जाते.

स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ साली पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील शिवाजीराव गिरधर पाटील राजकीय क्षेत्रात होते. तर आई विद्याताई पाटील समाजसेविका होत्या.स्मिता पाटील यांचे शिक्षण रेणुका स्वरूप मेमोरियल विद्यालय पुणे या शाळेमध्ये पूर्ण केले. स्मिता यांनी अभिनयाचे शिक्षण पुण्यातील फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात झाले होते. स्मिता यांनी दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील ‘बातमीदार’ या नात्याने केली. त्यानंतर श्याम बेनेगल यांच्या ‘चरणदास चोर’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले.त्यांचे अनेक मराठी चित्रपट हि गाजले आहेत. स्मिता यांनी या चित्रपट,दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणार्‍या मराठी अभिनेत्री होत्या.

अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केले की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या. मंथन या सिनेमातून त्यांनी सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रियांची व्यक्तिरेखा साकारली. तसेच भूमिका या सिनेमामधून पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणार्यार स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या. दलित, शोषित स्त्रियांच्या , बंडखोर स्त्रियांच्या , आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकार केल्या. स्मिता यांना दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्म फेअर अवॉर्डने गौरविण्यात आले. तसेच त्यांना पदमश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले. स्मिता पाटील यांचे लग्न अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत झाले.स्मिता व राज यांना एक मुलगा आहे प्रतीक बब्बर. गलियों के बादशहा हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

Related posts

रेणुका शहाणेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

News Desk

पाच राज्यात पद्मावत सिनेमा प्रदर्शित होणार नाही

News Desk

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याविषयी थोडक्यात…

News Desk