HW News Marathi
मनोरंजन

संगीत सम्राट पर्व २चा विजेता आज ठरणार

मुंबई | संगीत सम्राट पर्व २ या झी युवा वाहिनीवरील अनोख्या संगीतमय कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर संगीताची मोहिनी घातली आहे. बुधवार ते शुक्रवारी रात्री ९:३० वाजता सुरु होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला आहे. घराघरामध्ये हा कार्यक्रम सध्या पाहिला जातो. सूर, लय आणि ताल यांचा सुरेख संगम संगीत सम्राट या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राला पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या संगीत परंपरेचा मोठा वारसा झी युवा या वाहिनीने संगीत सम्राट या कार्यक्रमाद्वारे जपलेला पहायला मिळत आहे.

महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले अनेक गायक, वादक आणि ज्यांच्या श्वासात संगीत आहे अशा अनेक कलावंतानी संगीत सम्राटाच्या व्यासपीठाद्वारे मराठी रसिक प्रेक्षकांसमोर त्यांची कला सादर केली. महाराष्ट्रातील आघाडीचे गायक आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडे यांनी सूर, ताल आणि लय या मुद्द्यांद्वारे स्पर्धकांचे परीक्षण केले तर आपल्या चार कॅप्टन्सच्या चार टीम्स म्हणजेच सावनी रवींद्रची नादमधुर सह्याद्री, जुईली जोगळेकरची स्वरमयी कोकण, राहुल सक्सेनाची सुरसाज विदर्भ आणि अभिजीत कोसंबीची लयदार मराठवाडा यांच्यात ही चुरस रंगल्याचे पहायला मिळाले.

परीक्षकांनी सुद्धा संगीत सम्राटची उत्कंठा वाढविण्यासाठी नियमात फेरबदल करून चार ऐवजी सहा फायनलिस्ट ठेवले आहेत. त्याचबरोबर आनंद शिंदे आणि वैशाली सामंत हे दोन महाराष्ट्राचे आवडते गायक यांनी सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षण केले. संगीत सम्राट २ साठी कोकण कन्या, हरगुण कौर, जिज्ञेश वझे, फोक रिवाईवल, कैवल्य केसकर आणि संकेत बार्डिया या सहा स्पर्धकांमध्ये ही चुरस होणार आहे. या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Ganesh Chaturthi 2018 |रॉयलस्टोनमध्ये पंकजा मुंडेंनी केले बाप्पाचे थाटात स्वागत

Gauri Tilekar

लालबागच्या राजाच्या चरणी सोन्याची गणेश मुर्ती अर्पण

swarit

#IndependenceDay | कलम ३७० रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत

News Desk
क्राइम

सैन्यात भरती झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

हिंगोली – सैन्यात भरती झालेल्या 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. अमोल नामदेव पतंगे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. जिल्ह्यातील मौजे कामठा येथील ही घटना आहे.

कळमनुरीतालुक्यातील मौजे कामठा येथील रहिवासी असलेला तरुण अमोल नामदेव पतंगे (वय 19 वर्षे) हा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अहमदपूर येथील भरतीपूर्व सैन्य प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी गेला होता. नुकताच तो सैन्यात भरती झाला होता. सोमवारी (4 सप्टेंबर) त्याने औरंगाबाद येथे कागदपत्रं जमा केले व रात्री उशीरा घरी परतला. यानंतर दुस-या दिवशी सकाळी 8 वाजता त्यानं चुलतभावासोबत चहा घेतला. त्यानंतर घरात एकटाच टीव्ही पहात बसला.

आणि मग त्यानं घरात गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे.घरातल्यांची ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने अमोलला बाळापूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आत्महत्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी बाळापूर पोलीस पुढील तपास करीत असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related posts

जुहूमध्ये भाजपा आमदाराचे नाव घेऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

News Desk

सहा वर्षाच्या मुलीसोबत छेडछाड

News Desk

उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारू भट्टीवर छापा, 16 जणांवर गुन्हा दाखल

News Desk