HW News Marathi
महाराष्ट्र

आंबेनळी घाटात दरीत कोसळलेली बस काढली बाहेर

दापोली | आंबेनळी घाटातील दरीत कोसळलेली बस तब्बल ७ तासाच्या प्रयत्नांनी हायड्रा क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आली. आंबेनळी घाटातील अपघाताला दोन महिने उलटल्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्सच्या यांच्या मदतीने ही बस बाहेर काढण्यात आली. ही बस काढण्यासाठी महाबळेश्वर ते पोलादपूर मार्गवर ८ तास वाहतुकी बंद करण्यात आली होती.

महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात २८ जुलै २०१८ रोजी दापोली कृषी विद्यापीठाची बस ७०० ते ८०० फुट खोल दरीत कोसळली होती. त्यात विद्यापीठाच्या ३४ पैकी ३३ कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात प्रकाश सावंत देसाई हे एकमेव कर्मचारी वाचल्यामुळे सर्वांच आश्चर्यकारक वाटले. यानंतर प्रकाश सावंत-देसाई यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी या दुर्घटनेत मृत पावलेल्या नातेवाईकांनी केली आहे.

आंबेनळी घाटातील बस दरीतून काढण्यात आल्यानंतर परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या पाहणीतून अपघात कशामुळे झाला? या तपासातून पुढे येणार आहे. परंतु ही बस कोण चालवत होता? ३० जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मात्र या अपघातातून वाचलेले प्रकाश सावंतदेसाईच अपघातप्रसंगी बस चालवत असावेत, असा संशय व्यक्त केला आहे. बसच्या स्टेअरिंगवरील बोटाचे ठसे घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून त्यावरून अपघातप्रसंगी बस कोण चालवत होते, हे पुढे येणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात तृतीयपंथीय कल्याण मंडळाची स्थापना

News Desk

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे पैशांची अफरातफर करतायत, सोमय्यांचा गंभीर आरोप

News Desk

“आधी राष्ट्रवादीला बुडविण्याची भाषा, नंतर भुजबळांचा बाप काढला” शिवसेना खासदाराचा राग अनावर!

News Desk