HW News Marathi
महाराष्ट्र

नावेत बसून सेल्फी काढणे बेतले जीवावर

यवतमाळ | सकाळी साडे नऊच्या सुमारास हे ५ तरुण यवतमाळ तालुक्यातील राजूर गावाला लागूनच असलेल्या पैनगंगा नदीत आंघोळ करण्यासाठी गेले होते. मात्र, आंघोळी वेळी नदीत नावेवर बसून सेल्फी घेण्याचे साहस या तरुणांच्या जीवावर बेतले आहे. या पाच तरुणांपैकी शेख अर्षद (१४), शेख सुफिर सिराज (१६) या दोन तरुणांचा नदीत सेल्फी घेताना पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर सय्यद उमेद (१८) या तरुणाची प्रकृती गंभीर आहे. मोहरम सणासाठी आदिलाबाद येथील हे पाच तरुण यवतमाळ तालुक्यातील राजूर येथे आले होते.

तिथल्याच एका मच्छिमाराने गावाला या दुर्दैवी घटनेबद्दलची माहिती दिली. त्यानंतर गावातील लगेचच प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यापूर्वीच डॉक्टकरांनी त्यांपैकी दोघांना मृत घोषित केले होते.यवतमाळ तालुक्यातील राजूर येथील पैनगंगा नदीत दिसलेल्या नावेत बसून सेल्फी काढण्याची इच्छा या तरुणांना झाली होती. या पाचही तरुणांचा त्या नावेवर बसून सेल्फी काढताना नावेचा तोल गेला आणि ते पाण्यात बुडाले. तेथील डोह खोल असल्याने त्या तरुणांना पाण्यातून बाहेर येणे अवघड झाले. या नदीच्या पात्रात बुडालेले सर्वच जण तेलंगणाच्या आदिलाबद येथील रहिवासी आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

माझं अतिक्रमण नदी-ओढ्याभोवती होत असेल तरी हटवा, मुलाहिजा बाळगू नका – अजित पवार

News Desk

यंदा परतीचा पाऊस लांबणीवर, हवामान खात्याने वर्तवली शक्यता!

News Desk

जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा, तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला – शरद पवार

News Desk