HW News Marathi
मुंबई

जेएनयूतील घोषणाबाजीच्या वादावेळी मी तिथे नव्हतोच | कन्हैय्या कुमार

मुंबई | मी कधीही देशविरोधी घोषणा दिलेली नाही, असे सांगत जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष आणि विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडण केले. मुंबई येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यावर जेएनयूमध्ये भारताचे तुकडे तुकडे होतील अशी घोषणा दिल्याचा आरोप केला गेला होता. त्याविषयी बोलताना, ‘देशविरोधी घोषणा देताना जर मी कोणाला पाहिले तर मीच त्यांना रोखेन. तसेच जेएनयूतील घोषणाबाजीच्या वादाच्या वेळी मी तिथे नव्हतोच’, असेही ते म्हणाले.

जेएनयूमध्ये अफजल गुरुचा स्मृतीदिन साजरा केला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील बेरोजगारीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे अशी टीकाही त्यांनी केली. त्याचप्रमाणे मोदी सरकारचा राफेल करार प्रचंड खर्चिक असून सरकारने त्याची किंमत जाहीर करावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. केंद्रातील सरकारकडे महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत, असा आरोपही यावेळी त्यांनी केला. देशातील लोकशाही संकटात आहे तसेच देशात चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जात आहे, असेही ते म्हणाले.

विरोधकांचे विचार जसे असतील तसेच भाष्य ते करणार, असा टोलाही त्यांनी लगावला. देशातील अनेक घटकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत त्यांनी देशातील पत्रकारांवर असणाऱ्या दबावाचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्यावर केलेल्या राष्ट्रविरोधी असल्याच्या आरोपाचाही उल्लेख करत त्यांनी अशा मानसिकतेबद्दल चिंता व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्षांचा सत्कार समारंभ

swarit

पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी ठणठणीत, प्रजा फाउंडेशनचा अहवाल

Gauri Tilekar

पनवेल महापालिकेच्या आशिर्वादाने रहिवाशी त्रस्त

News Desk
महाराष्ट्र

पंढरपुरात मुस्लीम बांधवांनी आज कुर्बानीशिवाय केली बकरी ईद साजरी

News Desk

पंढरपूर | महाराष्ट्रासह संपूर्ण भारत बकरी ईद आज अगदी उत्साहामध्ये साजरी होत आहे. मात्र पंढरपूरमधील आजची ईद विशेष कारणामुळे चर्चेत आहे. पंढरपूर येथील मुस्लीम समाजातील बांधवांनी आज श्रावणी एकदाशी आणि बकरी ईद एकाच दिवशी साजरी होत असल्यामुळे, बकऱ्याची कुर्बानी न देता केवळ नमाज पठण करुन ईद साजरी केली. या आगळ्या वेगळ्या ईद साजरा करण्याच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा पंढरपूरमधील हिंदू- मुस्लीम एकात्मतेचे दर्शन झाले.

पंढरपूरमध्ये मागील अनेक दशकांपासून हिंदू- मुस्लीम समाज एकोप्याने नांदत आहे आणि आज मुस्लीम समजाने घेतलेले निर्णय हा त्याचीच पोचपावती आहे. याआधीही अशाप्रकारे एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आली होती, त्यावेळीही मुस्लीम समाजाने कुर्बानी रद्द करत नमाज पठण करुन ईद साजरी केली होती.

आज श्रावणी शुद्ध एकदशी असल्याने तीन लाखांहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. मंदिर परिसराबरोबर चंद्रभागा नदीच्या तिरावर आणि प्रदक्षिणा मार्गावर हजारोच्या संख्येने भाविक आहेत. तर मुस्लिम समजासाठी महत्वाचा समजला जाणारा बकरी ईदचाही सण आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना बकरी ईददरम्यान देण्यात येणाऱ्या कुर्बानीचा त्रास होऊ नये म्हणून मक्का मशिदीचे इमामसाब हाफिज शेख, अध्यक्ष निसरभाई शेख आणि समस्त मुस्लीम बांधवांनी आज कुर्बानीशिवायच बकरी ईद साजरा करण्याचा निर्णय घेतला.

Related posts

इम्तियाज जलील यांचा जल्लोष पाहिल्यानंतर अमेय खोपकर म्हणाले नाचताना शरम वाटली पाहिजे

News Desk

राज्यातील मोफत लसीकरणाबाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात…

News Desk

…पण तेव्हा कधी शेतकऱ्यांनी पिकं फेकून देण्याची वेळ आणली नाही

News Desk