HW News Marathi
मुंबई

आंबोली दुहेरी हत्याकांडाच्या मुख्य साक्षीदारांची हत्या… पहा कोणी केली हत्या

अंधेरीच्या अंबोली येथील दुहेरी हत्याकांडातला मुख्य साक्षीदार आणि पोलिसांचा खबरी अविनाश सोळंकी ऊर्फ बाली याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. शरीरारावर चाकूचे वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधातून बालीचा काटा काढल्याचे बोलले जात आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अपोलो इंडस्ट्रियल इस्टेटमधील एका गाळ्यात काल मध्यरात्री बालीचा मृतदेह आढळला. तो गाळा त्याचाच मित्र नरेश शुक्लाचा आहे. दोघेही तेथे दारू पीत बसायचे. बालीची हत्या झाल्यापासून नरेश फरार झाला आहे. बालीच्या पोटावर, डोक्यावर आणि गुप्तांगावर गंभीर वार करण्यात आले आहेत. दोन दिवसांपासून त्याचा मृतदेह त्या गाळ्यात पडून होता. नरेशनेच त्याची हत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. अनैतिक संबंधातून बालीची हत्या करण्यात आली असावी असे पोलीस सूत्रांकडून समजते. बाली हा पोलिसांचा खबरी होता. तसेच 2011 मध्ये अंबोलीमध्ये दुहेरी हत्याकांड घडले होते त्या प्रकरणात बाली मुख्य साक्षीदार होता. बालीने शेवटपर्यंत त्याची साक्ष बदलली नाही. त्यामुळे त्या गुह्यातील आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लंडनच्या राजकुमाराच लग्न, मुंबईत डबेवाल्यांनी केलं सेलिब्रेशन

News Desk

रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो त्यामुळे रक्तदान करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

swarit

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर मिटला बेस्टचा संप

News Desk