HW News Marathi
देश / विदेश

वाजपेयींच्या निधनामुळे सात दिवस राजकीय दुखवटा

मुंबई | भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे पहिले अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांचे दिर्घ आजाराने आज निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. वाजपेयी यांच्या निधनामुळे पुढील ७ दिवस राजकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. केंद्रसरकार कडून सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत देशाचा राष्ट्रध्वजाची उंची ध्वज स्तंभाच्या अर्धी ठेवण्यात येईल. तसेच त्यांच्यावर राजकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे उत्तर प्रदेश सरकारने उद्या एक दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नायजेरियात महिला दहशतवाद्यांचा हल्ला; २८ ठार

News Desk

फेसबुक, इन्स्टाग्राम सेवा डाऊन, ट्विटरवर तक्रारी

News Desk

बाबरी पाडली त्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना सामनातून उजाळा

News Desk
देश / विदेश

माजी पंतप्रधान अटल बिहारी यांचे निधन, राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली 

News Desk

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले. वाजपेयी केवळ राजकारणा पुरतेच मर्यादित नव्हते तर कवी मनाचे लेखक म्हणून देखील त्यांची जनमाणसात वेगळी ओळख होती.

देशाचे विद्यमान पंतप्रधान यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. “अटलजी आता आपल्यात राहिले नाहीत. त्यांचे जाण्याने माझे वैयक्तिक मोठे नुकसान झाले आहे. परंतु त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांची प्रेरणा कायम देशाला आणि भाजप कार्यकर्त्यांना मिळत राहील. ईशवर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. ईशवर त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद द्यावी. ओम शांती!” असे ट्विट करून मोदींनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही ट्विट करून वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली.

“अटलजींचे विचार, त्यांच्या कविता, त्यांची दूरदृष्टी, त्यांचे राजनैतिक कौशल्य हे नेहमीच आम्हाला प्रेरणा आणि मार्गदर्शन करीत राहतील. भारतीय राजकारणातील अशा अत्यंत मोठ्या व्यक्तिमत्त्वाला माझा प्रणाम! ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो! ओम शांती शांती शांती!”

नितीन गडकरी

“माझ्या शालेय जीवनापासूनच अटलजी माझे आदर्श होते. ‘पंतप्रधान सुवर्ण चतुर्भुज सडक योजना’ ह्या योजनेसाठी मी त्यांच्यासोबत काम केले होते. मी जेव्हा भाजप अध्यक्ष झालो तेव्हा त्यांनीच मला माझ्या भावनिक जबाबदारीची जाणीव करून दिली होती. आम्ही हे सरकार त्यांनीच दाखविलेल्या मार्गावर चालविण्याचा प्रयत्न करत आहोत. भाजपचे संसदेतील २ सदस्यांपासून आज सत्ता स्थापन करण्यापर्यंतचा त्यांच्याच प्रेरणेने आणि आशीर्वादाने शक्य आहे. प्रवास हा ते महानायक आणि अजातशत्रू आहे. अटलजी अमर आहेत. आमच्या आत्मविश्वासाच्या रूपात ते कायम आमच्यासोबत आहेत. त्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली” असे ट्विट करत नितीन गडकरी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली.

Related posts

ड्रायव्हींग लायसन्स मिळण्यासाठीची शिक्षणाची मर्यादा शिथिल

News Desk

पतीने फोन उचलला नाही म्हणून आत्महत्या

News Desk

चांद्रयान-२ : इतिहास रचण्यासाठी सज्ज

News Desk