HW News Marathi
मुंबई

विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

मुंबई |भांडुप पश्चिममधील सह्याद्री विद्यामंदिर शाळेत सातवी इयत्तेत शिकणाऱ्या १६ विद्यार्थ्यांना आणि एका शिक्षिकेला खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. विषबाधा झालेल्या सर्व अग्रवाल रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे अग्रवाल रुग्णालयाचे डॉक्टर उषा मोहप्रेकर यांनी सांगितले.

सह्याद्री विद्यामंदिर शाळेत आज दुपारी खिचडी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. दरम्यान खिचडी खाल्ल्यानंतर सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि एका शिक्षिकेला पोटात मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर या सर्वांना अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे अग्रवाल रुग्णालयाचे डॉक्टर उषा मोहप्रेकर यांनी सांगितले. रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांची मुलुंडचे आमदार तारा सिंग यांनी भेट घेऊन विचारपूस केली आहे.

गोवंडीतील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत औषधातून विषबाधा झाल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून जवळपास १९७ विद्यार्थ्यांना शुक्रवारी दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत विद्यार्थिनीचे नाव चांदणी साहिल शेख (१२) असे आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे शाळेत दिल्या जाणाऱ्या औषध आणि अन्न पदार्थांवर प्रश्नचिन्हे उभे राहिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भावी पोलिसांसाठी मनसे आली धावून

News Desk

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | आरोपींची पोलीस कोठडी देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

News Desk

डोंबिवलीतलं अतिक्रमण पाडायला प्रशासनाला वेळ नाही

News Desk
महाराष्ट्र

ग्रामीण भागातील महिलांची ढाल

Adil

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने यंदा प्रथमच परिषदेत सर्वाधिक महिला प्रतिनीधींना प्रधान्य देण्यात आले आहे. या परिषदेत महिला अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह सात महिलांना सदस्य पद देण्यात आले असून यात महाराष्ट्रातुन माण तालुक्यातील म्हसवड, माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्ष चेतना सिन्हा यांनी सहअध्यक्षपद भूषविले आहे. चेतना सिन्हा यांनी ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरण करण्यात मोलाचे योगदान दिले आहे.

ग्रामीण भागातील महिलांमधील कौशल्य आणि कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांनी योग्यती संधी उपलब्ध करुन दिली आहे. सिन्हा यांनी गावागावातील महिलांना एकत्र करुन त्यांचे गुण समाजासमोर आण्याचा प्रयत्न केला. यासाठी सिन्हा यांनी जिल्ह्य आणि राष्ट्रीय स्तरावर या महिलांनी बनविलेल्या खाद्यपदार्थ, हातकाम आणि विणकामच्या वस्तूना बाजारपेठ उपलब्ध करुन दिली. तसेच ग्रामीण भागातील महिलांसाठी ‘माणदेशी महोत्सवा’चे आयोजन शहरी भागात केले जाते. जेणे करुन शहरी भागातील लोकांना ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडते. या महोत्सवात या महिलांनी बनविलेल्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी लोकांना मिळतात. तसेच या माध्यमातून महिलांना उत्तम रोजगार देखील मिळतो. यामुळे ग्रामीण भागातील महिला स्वत:च्या पायावर उभी राहताना दिसत आहे.

‘या परिषदेत महिलांचे प्रश्न हाताळण्यावर जास्त भर देण्यात येणार असून नोकरदार महिलांना कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक आणि मालमत्तेचा मालकी हक्क मिळावेत या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. तसेच ‘इन्व्हेस्ट इंडिया’ याचा प्रचार देखील केला जाणार आहे. भारतात गुंतवणूक करण्यासाठी आताचा काळ योग्य असल्याचे चेतना सिन्हा यांनी सांगितले.’

या फोरमची स्थापना १९७१ मध्ये करण्यात आली असून जागतिक पातळीवरील नेते, वैज्ञानिक, उद्योगपती, सामाजिक संस्था या जागतिक समस्यांवर चर्चा करुन हे विविध उपक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर राबविण्याबाबत नियोजन करतात. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ४८ वी आर्थिक परिषद २३ ते २६ जानेवारी या कालावधीत स्वित्झर्लंडमधील दावोसा येथे सुरू होणार आहे. या परिषदेत संपूर्ण जगातील ७० देशांतील प्रमुख डब्ल्यूटीओ, आयएमएफ आणि विश्व बँकेसह प्रमुख आंतरराष्ट्रीय समुदायाचे ३८ मान्यवर व त्या देशातील मंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच भारतातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहा केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशातील नामांकित कंपन्यांचे सीईओही परिषदेत सहभागी होणार आहे.

Related posts

दिवाळी आधी मदत मिळणार, सरकार शेतकऱ्यांसोबत असून कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही – बच्चू कडू

News Desk

“घरात राहायला तुम्ही सांगत होता मग तुम्हीच…”,भाजप प्रवक्त्या मोदींवर भडकल्या

News Desk

आता तरी राज्यातील चाचण्या वाढवा, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून विनंती

News Desk