HW News Marathi
देश / विदेश

भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारला

नवी दिल्ली | पाकिस्तानमध्ये भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना शनिवारी पाकिस्तानच्या सरकारने रावळपिंडीजवळील गुरुद्वारामध्ये प्रवेश देण्यास नकार दिला. अजय बिसारिया हे पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त आहेत. या प्रकरणानंतर भारत सरकारने तीव्र संताप व्यक्त केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

अजय बिसारिया हे आपल्या पत्नीसह रावळपिंडीनजीक असलेल्या हसन अब्दल येथील पंजा साहिब गुरुद्वारा येथे जात होते त्यावेळी त्यांना अडविण्यात आले. गुरुद्वारामध्ये जाण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या देखील त्यांनी घेतल्या होत्या. तरीही त्यांना या ठिकाणी ऐनवेळी प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे इस्लामाबादला माघारी फिरावे लागले.

सदर प्रकरणानंतर पाकिस्तानच्या या कृत्याचा भारताकडून निषेध व्यक्त केला जात आहे. भारताने हा मुद्दा पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडे उपस्थित केला असल्याने या कृतीच्या माध्यमातून पाकिस्तानचा उद्दामपणा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. मागच्या दोन महिन्यातील अजय बिसारिया यांना गुरद्वारामध्ये प्रवेश नाकारल्याची ही दुसरी घटना आहे. अजय बिसारिया गुरुद्वारामध्ये शिख भाविकांची भेट घेण्यासाठी जात असल्याची माहीती समोर आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तेलुगू देसम पक्षाचे नेते नंदामुरी हरिकृष्णा यांचा भीषण अपघातात मृत्यू

News Desk

कोरोनाचा महाराष्ट्रात तिसरा बळी , देशात ८ रूग्णांचा मृत्यु

Arati More

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जगाला हेवा वाटेल असे स्मारक महाविकास आघाडी उभारणार !

News Desk
राजकारण

विरोधकांमुळे सरकार बाबत जनता संभ्रमावस्थेत | मोदी

News Desk

राजगड | सरकार विरोधात विरोधक संभ्रमावस्था, नैराश्य पसरवत असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मोदी मध्य प्रदेशातील मोहनपुरा धरण प्रकल्पाचे लोकार्पण सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये विरोधकांवर टिकास्त्र सोडले.

मेक इन इंडिया आणि स्टार्ट अपच्या माध्यमातून देशातील युवकांना रोजगारच्या संधी उपलब्ध करुन देण्याकडे आमचे लक्ष लागले असल्याचे मोदींनी यावेळी म्हणाले. तसेच गांधी कुटुंबाचे महत्त्व वाढविण्यासाठी इतरांना संधी देण्यात आली नाही, असे बोलून मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे.

काँग्रेस पक्षाने सर्वाधिक काळ सत्ता उपभोगूनही लोकांचा विश्वास जिंकण्यात मात्र यश आले नाही. तसेच आम्ही गेल्या चार वर्षात आत्मविश्वासाने मार्गक्रमण करत आहोत, असे देखील मोदींनी सांगितले.

Related posts

जनतेच्या मनातील आग व्यक्त करण्यासाठी निवडणूक लढवतोय !

News Desk

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरलावून सेनेला घरचा आहेर

News Desk

ठाण्यातील किसननगर भागात शिंदे-ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

Aprna