HW News Marathi
देश / विदेश

अटल बिहारी वाजपेयी यांच्या तब्येतीत सुधारणा

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तब्येतील सुधारणा होत असल्याची माहिती एम्स रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये म्हटले आहे. त्यामुळे त्यांना येत्या काही दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. वाजपेयी यांना मूत्रसंसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याचे एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगतले होते.

त्यानंतर त्यांच्या तब्येतीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. वाजपेयी यांच्या तब्येतीविषयी माहिती देणारे बुलेटीनी देण्याचा निर्णय एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतला. त्यानंतर डॉक्टर वाजपेयींच्या तब्येतीची माहिती देण्यास सुरुवात केली. गेल्या ४८ तासांमध्ये वाजपेयींच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. तसेच मूत्रपिंड व्यवस्थित काम करत असून रक्तदाब आणि हार्ट रेट देखील चांगले असल्याची माहिती एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गुगलचे कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाईंची भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक

News Desk

आमचा अंत पाहू नका, इराणचा देखील पाकिस्तानला इशारा

News Desk

नववर्षात पेट्रोल-डिझेल स्वस्त

News Desk
महाराष्ट्र

भिडेंवर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल

swarit

पुणे : श्री शिवप्रतिष्ठांचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या आंब्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. भिडेंवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. यासाठी अखिल पत्रकार सुरक्षा संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील जगताप यांनी भिडे यांच्याविरोधात विश्रामबाग वाडा येथे गुन्हा दाखल करण्याचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.

‘माझ्या बागेतील आंबे खाल्याने मूले होत असल्याचे’, वक्तव्य संभाजी भिडे यांनी नाशिक येथे झालेल्या सभेत केले होता. तसेच हा आंबा आपण १८० जोडप्यांना दिला होता. आणि त्यातील १५० जोडप्यांना मूल झाले असल्याचा दावा भिडेंनी केला होता. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांच्या या विधानाचा निषेध करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

या अर्जात विधानामुळे महिलांचा अपमान झाला असून शास्त्रीय वैद्यकीय उपाय व उपचार यावरील विश्वासाला तडा जाण्याचा धोका निर्माण केला असल्याचे देखील यात म्हटले आहे. तसेच जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम ३ नुसार गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

Related posts

दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

News Desk

राजू शेट्टींनी घेतली राज ठाकरेंची भेट

Atul Chavan

शिवस्मारक ठरणार जगातील सर्वात उंच स्मारक

swarit