HW News Marathi
राजकारण

गडकरींनी घेतली सलमानची भेट

मुंबई | भाजपच्या जनसंपर्क समर्थन अभियान अंतर्गत शुक्रवारी प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांची त्यांच्या निवासस्थानी जावून केंद्रिय भूपृष्ठ परिवहन महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेतली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौ-यानंतर भाजपातील इतर नेत्यांनीही महाराष्ट्रात जनसंपर्क समर्थन अभियानाला सुरुवात केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नितीन गडकरी हे केवळ सलमान खानलाचं नाही तर रात्री ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, येस बॅंकेचे अध्यक्ष राणा कपूर यांनाही भेटणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

केंद्रात सरकारला चार वर्षे पुर्ण झाल्यामुळे दोन दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई भेटीत जनसंपर्क समर्थन अभियान अंतर्गत अभिनेत्री माधुरी दिक्षीत आणि उद्योजक रतन टाटा यांची भेट घेतली होती. केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी जनसंपर्क समर्थन अभियान अंतर्गत प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या बांद्रा येथील बॅण्ड स्टॅण्ड परीसरातील गॅलेक्सी निवासस्थानी जावून सलमान खान आणि समिल खान यांची भेट घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तृणमूल काँग्रेसने फेटाळला ममता बॅनर्जींचा राजीनाम्याचा प्रस्ताव

News Desk

महिलांचे रक्षण हीच आमची संस्कृती | ठाकरे

News Desk

#LokSabhaElections2019 : अखेर हार्दिक पटेल यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk
महाराष्ट्र

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उद्धव-शरद पवार एकत्र

News Desk

मुंबई- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी दहा दिवसांपूर्वी भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. खूद्द शरद पवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असल्याने राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे.

या भेटीत दोन्ही नेत्यांदरम्यान राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. पवार यांच्या निवासस्थानी 10 दिवसांपूर्वी ही भेट झाली. या भेटीची राजकीय वतुर्ळात मात्र वेगवेगळी चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेसला रामराम केलेले आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी एनडीएला पाठिंबा दिला आहे. तसेच सरकारमध्ये ते सहभागी होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. राणेंचा सत्तेत सहभाग झाला तर शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, भाजप राणेंना मंत्रीमंडळात स्थान देण्याला शिवसेनेचा विरोध आहे. तसेच भाजपही शिवसेनेला पाण्यात पाहण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना सत्तेत राहूनही भाजपविरोधात आंदोलन करत आहे. ते भाजपला सहन होत नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील दूरावा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे उद्धव-ठाकरे यांच्या भेटीला महत्व आले आहे.

गेल्याच आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. राणे सत्तेत असतील तर शिवसेना सत्तेत राहणार नाही, असे संकेत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये राहण्याची मानसिकता नाही, त्यामुळे या भेटीमुळे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

Related posts

गारपिठीमुळे पिकांप्रमाणे शेतकऱ्यांची घरही कोसळली

News Desk

माजी राज्यमंत्री अशोक शिंदेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

News Desk

आर्थिक संकट लक्षात घेता, येत्या काळात वैयक्तिक जीवनात काटकसरीने काम करा !

swarit