HW News Marathi
महाराष्ट्र

धक्कादायक! बीडमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

बीड | सध्या राज्यभरात १० वीची बोर्ड परीक्षा सुरू आहे. दरम्यान, बऱ्याच दिवसांपासून ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार की ऑफलाईन हा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांनाही पडला होता. अखेर निर्णय आला आणि परीक्षा ऑफलाईन स्वरूपात सुरू झाल्या. जरी ह्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्र विद्यार्थी शिकत असलेली त्यांचीच शाळा असली तरी सुमारे २ वर्षे ऑनलाईन शिक्षण ग्रहण केलेल्या विद्यार्थ्यांना लिखीत स्वरूपात परीक्षा देणे कठीण जात आहे असं म्हटलं जातंय. त्यातच आता बीडमधून एक धक्कादायक घटना समोर येतेय.

दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका सोळा वर्षीय विद्यार्थीनीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे. सृष्टी रोहिदास काळे असं मृत विद्यार्थिनीचे नाव असून सृष्टीची सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. बीडच्या छत्रपती कॉलनीत ती मामाकडे वास्तव्यास होती. तिचे आणखीन तीन विषयाचे पेपर शिल्लक आहेत. रात्रीच्या सुमारास घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सृष्टीचा मृतदेह आढळला. नातेवाईकांनी पोलिसांना घटना सांगितल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी सृष्टीचा मोबाईल जप्त केलाय. सृष्टीची हत्या आहे की आत्महत्या याचा तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत. परीक्षा सुरू असतानाच मृतदेह आढळल्याने बीडमध्ये खळबळ माजली आहे.

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी त्यांच्या मागण्यांसाठी उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार घातल्यामुळे दहावी आणि बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यावर आता काय मार्ग काढला जाणार हे पाहावं लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचे ४५ आमदार आमच्या संपर्कात, भाजप खासदारचा दावा

News Desk

मला कुणी शिकवण्याची गरज नाही, फडणवीस बोलले तरच उत्तर देईन!

News Desk

आपत्कालीन परिस्थितीत शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून काम करा! – मुख्यमंत्री

Aprna