HW News Marathi
क्राइम

कर्जत वीज महावितरणचे उपकार्यकारी अभियंत्याला ५०हजारांची तर नेरळच्या शाखा अभियंत्याला १० हजारांची लाच घेताना अटक

कर्जत: कर्जत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता बालाजी वाघमोडे यांना बुधवारी ५० हजारांची तर नेरळ चे शाखा अभियंता भाऊसाहेब कोंडीबा चौधरी याला १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ठाणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी साफला रचून ही कारवाई केली.

नेरळ येथील तक्रारदार यांच्या २५ फ्लॅटच्या सोसायटीमधील विद्यत मीटर जोडणीचे काम करायचे होते. त्यासाठी वीज वितरणचे स्थानिक अधिकाºयांनी विद्युत मीटर जोडणीच्या कामाची फाइल लोकसेवक कार्यालयात मंजुरी मिळण्यासाठी पाठवली होती. तक्रारदारांना लोकसेवक यांनी प्रती दोन हजार रुपये प्रमाणे एकूण ५० हजारांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता नमूद लोकसेवक यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन झाल्यावरून एबीसी ठाणे यांनी सापळा रचून कर्जत महावितरणचे उप कार्यकारी अभियंता बालाजी वाघमोडे याला ५० हजारांची तर नेरळ चे शाखा अभियंता भाऊसाहेब चौधरी याला १० हजारांची लाच घेताना अटक केली.

https://www.facebook.com/mahabatmi365/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जीला जामीन, सीबीआयच्या विनंतीनंतर ६ आठवड्यांची स्थगिती

swarit

कुरिअर बॉय म्हणून घरात घूसून लुटले दोन कोटी

News Desk

पोलिस अधिका-यांचा गौरव करणे पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम – सहाय्यक पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत 

News Desk
देश / विदेश

पारंपरिक पौरहित्याला फाटा देत पुतळ्याला फेरे मारून केले लग्न

News Desk

भोपाळ- पारंपरिक विवाहपद्धतीला फाटा देत मध्य प्रदेशातील सिहोरमधील तरुण-तरुणीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती फेरे घेऊन सत्यसोधन पद्धतीने लग्न केले. या लग्नाचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियावर त्याची मोठी चर्चा आहे. पौराहित्य पद्धत हद्दपार करण्यासाठी नव्या पिढीने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊलं मानलं जात आहे.

मध्य प्रदेशमधील कल्लू जाटव आणि वैजंती राजोरिया यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला

सात फे-या मारून लग्न केले. काही सामाजिक संघटना आणि पुरोगामी नागरिकांच्या मतदीने हे कार्य पार पडले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने या जोडप्याने हे लग्न केल्याचे सांगितले जात असले तरी त्यांनी उचलले पाऊलं क्रांतीकारक असेच म्हणावे लागेल. अशा प्रकारच्या कार्यामुळे यापुढे पारंपरिक प्रचलित पौराहित्याची पद्धत हद्दपार होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related posts

अमित शहाच्या स्वागतासाठी बॉईक रॅलीमुळे वाहतूक कोंडी

swarit

आरपीएफ जवानाने लहान मुलाचे प्राण वाचवले

swarit

जपानमध्ये ओव्हरटाइम केल्यानंतर पत्रकाराचा मृत्यू

News Desk