HW News Marathi
क्राइम

जेव्हा 900 किलो टोमॅटोची चोरी होते

मुंबईः पावसाळ्याच्या तोंडावर भाजीपाल्याचे दर गगणला भिडतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाज्यांचे दर गगणाला भिडले आहेत. मुंबई- पुण्यात टोमॅटोचे दर तर शंभरी पार गेले आहेत, अशा आणिबाणीच्या परिस्थितीत टोमॅटो पळवण्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. दहिसर पोलीस हद्दीतील अविनास कंपाऊंडमधील भाजी मार्केटमधून चक्क 900 किलो टोमॅटोची चोरी झाली आहे. चोरी झालेल्या टोमॅटोची किंमती लाखोंच्या घरात असून हा माल कोणी चोरला आहे, याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. त्याचे कारण म्हणजे चोरीला गेलेले टोमॅटो बाजारात विक्रीला गेले असण्याची शक्यता असून ते ग्राहकांनी खरेदी करून फस्तही केले असणार त्यामुळे या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांसमोर मोठा पेच उभा राहणार आहे. व्यावसायिक स्पर्धेतून ही चोरी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी चोरांचा छडा लावणे पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अखेर अमरावतीतील ‘ती’ तरुणी साताऱ्यात सापडली; पोलीस आज घरी आणणार

Aprna

१९ सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Aprna

आंध्रप्रदेशातून अपहरण केलेल्या व्यक्तींची उस्मानाबाद पोलिसांकडून यशस्वी सुटका

Aprna
मुंबई

  विश्वजीत कदम, उद्योजक अविनाथ भोसलेंच्या घरावर आयकर विभागाचा छापा

News Desk

वृत्तसंस्थाः काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि उद्योजक अविनाश भोसलेंच्या या दोघांच्याही निवासस्थान आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापा घातला आहे. माजी वनमंत्री पतंगराव कदम यांचे सुपुत्र असलेले विश्वजीत कदम हे उद्योजक अविनाश भोसले यांचे जावई आहेत. छापेमारी कोणत्या कारणाने झाली आहे, याबाबत अस्पष्टता आहे. अधिकारी सध्या तपासणी करत आहेत. सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे.

अविनाश भोसले यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन काढून घेतले आहेत. अशीच तपासणी विश्वजीत कदम यांच्या कार्यालयातही सुरु आहे. अविनाश भोसले आणि विश्वजीत कदम यांच्या कोण-कोणत्या कार्यालयांवर छापेमारी झाली आहे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. छापेमारी कोणत्या कारणाने झाली आहे, याबाबतही अस्पष्टता आहे.

Related posts

मुले विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,

News Desk

भाजपच्या ‘आश्वासनाचा फुगा’ जनताच फोडेल

News Desk

युती तुटल्यास शिवसेनेला ‘दे धक्का’साठी भाजपाची रणनीती

News Desk