HW News Marathi
क्राइम

टिप्पर – टाटा सुमोच्या धडकेत एकाच कुटूंबातील ६ जणांचा मृत्यू तर ११ जण जखमी

उत्तम बाबळे

नांदेड :- लग्न सोहळ्याची मांडव पर्तनी करुन पाहुण्यांकडून घरी परत येत असतांना बेंद्री (तांडा)ता.भोकर येथील जाधव परिवाराची टाटा सुमो वसमत फाटा ते अर्धापुर महामार्गावरील मेंढला शिवारातील महादेव मंदिराजवळ असलेल्या महामार्ग पोलीस चौकी पासून दीड कि.मी. अंतरावर उभा असलेल्या नादुरुस्त रेती वाहक टिप्परला धडकली.झालेल्या भिषण अपघातात जाधव कुटूंबातील ६ जण जागीच ठार तर ११ जण जखमी झाले असून या दुर्दैवी अपघाताने बेंद्री तांडा गावावर शोककळ पसरली आहे.

बेंद्री (तांडा) ता.भोकर जि.नांदेड येथील रहिवासी असलेले जाधव कुटूंबिय हे कांही दिवसापुर्वी परिवारात संपन्न झालेल्या विवाहसोहळ्या निमित्ताने मांडव पर्तनीसाठी पाहुण्यांकडे गेले होते.मांडव पर्तनीचा कार्यक्रम आटोपुन ते टाटा सुमो जिप क्र.एम.एच.२६-एल.०८०६ ने एक देव दर्शन करुन गावाकडे परत येत असतांना २८ मे २०१७ रोजी रात्री १०:१५ ते १०:३० वाजताच्या सुमारास वसमत फाटा ते अर्धापुर महामार्गावरील मेंढला शिवारातील महादेव मंदिराजवळ असलेल्या महामार्ग पोलीस चौकी पासून दीड कि.मी. अंतरावर आले असतांना त्यांची भरधाव जिप रस्त्यावर उभा असलेल्या नादुरुस्त रेती वाहक टिप्पर क्र. एम.एच.१८ ए. ए. १४७८ वर अतिशय जोराने धडकली.झालेल्या या भिषण अपघातात जाधव कुटूंबातील किसन मोतीराम जाधव ,रामराव रूपसिंग जाधव ,सुधाकर जयंत जाधव, जयंत रूपसिंग जाधव ,जनाबाई रामराव जाधव,आर्जुन जयंत जाधव ,हे ६ जण जागीच ठार झाले.तर राजु रामराव जाधव ,बालाजी सायबु सोळंके ,अर्चना सुधाकर जाधव ,वर्षा आर्जुन जाधव ,पल्लवी आर्जुन जाधव ,पायल आर्जुन जाधव,बाबू रूपसिंग जाधव ,रूपसिंग गुंडाजी जाधव ,कल्पना बाबु जाधव ,मारोती बाबु जाधव ,सचिन कैलास राठोड हे जखमी झाले आहेत.तसेच जखमीत ५ जण गंभीर जखमी असून मयतात एका महिलेचा समावेश अाहे. या भिषण अपघाताची माहिती मिळताच जवळच असलेल्या महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.मयत व जखमींना घटनास्थळावरुन बाहेर काढले व सर्व जखमींची अधिक उपचारार्थ नांदेड येथील शासकिय रुग्णालयात तात्काळ रवानगी केली.तर घटनास्थळी व रुग्णालयात वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी भेट दिली व पो. नि. विजय डोंगरे, सहाय्यक.पो.नि.दिपक दंतूलवार यांनी भेट देवून कायदेशिर कार्यवाहीसाठी प्रयत्न केले. तसेच रात्री उशीरा टिप्पर मालक व चालका विरुद्ध अर्धापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढी तपास अर्धापुर पोलीस करत आहेत. बेंद्री तांडा येथील एकाच कुटूंबातील ६ जणांचा दुर्दैवी मृत्यु व जखमी झाल्याने गाव आणि परिसरावर शोककळा पसरली असून २९ मे रोजी त्यांच्यावर गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंदाकिनी खडसे यांना तूर्तास दिलासा…

News Desk

आमदारांच्या राखीव डब्ब्यात चोरी, २ आमदारांची महत्त्वाची कागदपत्रे आणि पैसे चोरीला

News Desk

गोखले पूल दुर्घटनेच्या १६ तासानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत

News Desk