HW News Marathi
क्राइम

तृप्ती देसाईवर अ‍ॅट्रॉसिटी

पुणे: भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीविरोधात हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीविरोधात एका व्यक्तीला मारहाण करुन त्याच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे. २७ जून २०१७ रोजी सकाळी साडे अकरा वाजता बालेवाडी येथील व्हिनस ग्रॅनाईडजवळ होंडा अमेज गाडीतून तृप्ती देसाई यांच्यासोबत जात होतो. तेव्हा प्रशांत देसाई, सतीश देसाई, कांतीलाल गवारे आणि इतर दोघांनी अर्टिगा गाडीतून येऊन अमेझ गाडीसमोर अर्टिगा आडवी घातली. यानंतर गाडी थांबवायला सांगून तृप्ती देसाईसह सर्वांनी लाकडी दांडक्याने आणि लोखंडी रॉडने मारहाण केली, असे विजय मकासरे यांनी सांगितले. यानंतर प्रशांत देसाई यांनी गळ्यातील सव्वा तोळ्याची सोन्याची चैन आणि २७ हजार रुपये काढून घेतले. तसेच तृप्ती देसाई यांनी आमच्याविरोधात गेलास तर तुज्यावर खोटे गुन्हे दाखल करेन, अशी धमकी दिली आणि जातीवाचक शब्दांचा वापर केला, असा आरोप विजय मकासरे यांनी केला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात तृप्ती देसाई आणि प्रशांत देसाई यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी, रस्ता अडवणे, मारहाण करणे, धमकी देणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर बॉम्ब; फेक कॉल करणारा पोलिसांच्या ताब्यात

Aprna

“तीन जणांकडून आमच्या घराची रेकी, कुटुंबाला धोका”- क्रांती रेडकर

News Desk

लखीमपूर हिंसाचारप्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणतात महाराष्ट्रासारख्या धनाढ्य राज्यासोबत बिहारची तुलना कशी काय ?

News Desk
देश / विदेश

पारंपरिक पौरहित्याला फाटा देत पुतळ्याला फेरे मारून केले लग्न

News Desk

भोपाळ- पारंपरिक विवाहपद्धतीला फाटा देत मध्य प्रदेशातील सिहोरमधील तरुण-तरुणीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती फेरे घेऊन सत्यसोधन पद्धतीने लग्न केले. या लग्नाचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियावर त्याची मोठी चर्चा आहे. पौराहित्य पद्धत हद्दपार करण्यासाठी नव्या पिढीने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊलं मानलं जात आहे.

मध्य प्रदेशमधील कल्लू जाटव आणि वैजंती राजोरिया यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला

सात फे-या मारून लग्न केले. काही सामाजिक संघटना आणि पुरोगामी नागरिकांच्या मतदीने हे कार्य पार पडले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने या जोडप्याने हे लग्न केल्याचे सांगितले जात असले तरी त्यांनी उचलले पाऊलं क्रांतीकारक असेच म्हणावे लागेल. अशा प्रकारच्या कार्यामुळे यापुढे पारंपरिक प्रचलित पौराहित्याची पद्धत हद्दपार होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related posts

६ डिसेंबरला बाबरी मशीद जादूने पाडण्यात आली होती का? ओवीसींची संतप्त प्रतिक्रिया

News Desk

Section 377 | सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

News Desk

राज्याच्या चिंतेत वाढ ! कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १ लाखाच्या जवळपास

News Desk