HW News Marathi
क्राइम

नांदेड जिल्ह्यात ५ ते ३० जुलै दरम्यान फिरत्या लोकन्यायालयाचे आयोजन

नांदेड :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये तसेच प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा सविता बारणे यांच्या मार्गदर्शनानुसार “न्याय आपल्या दारी” या योजनेंतर्गत नांदेड जिल्हयात ५ ते ३० जुलै २०१७ या दरम्यान फिरते लोकन्यायालय व फिरते कायदे विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या फिरत्या न्यायरथाची सुरवात जिल्हा न्यायालय नांदेड येथे ५ जुलै २०१७ रोजी सकाळी दहा वाजता होणार असून या उद्घाटन सोहळयानंतर हे फिरते न्यायालय पुढे मार्गस्थ होणार आहे.

यावेळी आपसातील वाद असलेली दाखल पुर्व प्रकरणे तसेच प्रलंबित असलेली दिवाणी व तडजोडपात्र असे फौजदारी प्रकरणांमध्ये आपसात तडजोड करून कायमची निकाली काढणार आहेत. याचा एक मुख्य फायदा म्हणजे निकाली निघालेल्या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंच्या पक्षकरांना कुठल्याही प्रकारचे अपील करता येत नाही. सर्व पक्षकार बांधवांनी आपले आपसातील वाद कायमचे मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयामध्ये जावून आपले प्रकरण फिरत्या लोकन्यायालयामध्ये ठेवण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा सविता बारणे, सचिव डी. टी. वसावे तसेच सर्व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा सर्व न्यायाधीश यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उदय सामंत आणि संभाजी राजेंच्या बोटीला अपघात; सुखरुप बचावले

Aprna

बसवर फेकला पेटता गोळा

News Desk

भूयार खोदून बँक ऑफ बडोदा फोडली

News Desk
क्राइम

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी महिला कर्मचऱ्यास पोलीस कोठडी, पाच अटकेत

News Desk

मुंबई मंजूळा हत्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने भायखळा तुरूंगातील पोलिस अधिकाऱ्यांसह पाच जणांना अटक केली आहे. मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे मंजुळावर जेलमध्ये अन्याय करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. यातील बिंदू नायकवडे या पोलीस कर्मचाऱ्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली. २३ जून रोजी सकाळी तिने दोन अंडी व पाच पाव कमी मिळाल्याची तक्रार तुरुंग प्रशासनाकडे केली. त्यानंतर तिला पोलिसांनी मारहाण केली. केवळ या एका घटनेमुळे तिला प्राण गमवावे लागले.

बातम्यांच्या अपडेटसाठी करा आमच्या फेसबुक पेज, ट्विटर आणि जी प्लसला फाॅलो करा https://www.facebook.com/mahabatmi365/

https://plus.google.com/u/0/

https://twitter.com/

Related posts

लहान मुलांच्या वादात मोठ्यांची हाणामारी

News Desk

अमृता फडणवीस फसवणूक प्रकरण; मुंबई पोलिसांनी डिझायनरला उल्हासनगरमधून घेतले ताब्यात

News Desk

आठ वर्षाच्या बालकाची निर्घृण हत्या

News Desk