HW News Marathi
क्राइम

पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतले विष..

बीड -शेजाऱ्याने जागा बळकावल्याची तक्रार देऊनही पोलिसांकडून काहीच कारवाई होत नसल्याने त्रस्त झालेल्या एका इसमाने पोलीस अधीक्षक कार्यालयातच विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. श्रीकृष्ण बापुराव सुरासे (वय ५५) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या इसमाचे नाव असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

श्रीकृष्ण बापुराव सुरासे (रा. तलवाडा) यांच्या नावे १५ बाय २० जागा आहे. प्रत्यक्षात त्यांच्या ताब्यात सध्या केवळ सात फुट जागा आहे. उर्वरित जागा शेजारी मुसा मिस्त्री याने बळकावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दोन महिन्यांपासून या कारणावरुन मुसा व श्रीकृष्ण सुरासे यांच्यात वाद होता होता. या प्रकरणी सुरासे यांनी तलवाडा पोलिसांतही तक्रार दाखल केली होती. ग्रामपंचायतीकडेही निवेदन दिले होते. परंतु, तलवाडा पोलिसांनी असहकार्य करुन पोलिस कॉन्स्टेबल चव्हाण यांनी आपल्याला ठाण्याबाहेर हाकलून दिल्याचा आरोप सुरासे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वाशिम जिल्हा कृषी विकास अधिकारी धापाते लाच घेतना रंगे हात अटक

News Desk

श्रध्दा वालकर प्रकरणी विशेष पोलीस पथकामार्फत चौकशी करणार; उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Aprna

पत्नीच्या हत्येच्या आरोपातून शोएबची निर्दोष मुक्तता

swarit
देश / विदेश

बिहारमध्ये राजकीय भूकंप

News Desk

नवी दिल्ली: बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. जेडीयूच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपाल के. एन. त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. इतकेच नाही तर मोदींनी त्यांना भाजपमध्ये येण्याची आॅफरही दिली आहे. भ्रष्टाचाराशी आपण एकत्र लढू असेही मोदींनी म्हटले आहे.

तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपद न सोडण्यावर ठाम आहेत. आरोप असलेल्या मंत्र्यांसोबत काम करणे अशक्य असल्याचे नितिशकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले आहे. बिहारच्या हितासाठी आपण काहीही करायला तयार आहे.

बिहारमधील जेडीयू-आरजेडी-काँग्रेस महायुती अवघ्या २० महिन्यांत तुटली आहे. लालू प्रसाद यादव यांनी ही चर्चा वायफळ असल्याचे म्हटले होते. महाआघाडी तुटण्याचा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले होते.

‘नितीशकुमारांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितलेला नाही. या प्रकरणात मीडियालाच अधिक स्वारस्य आहे. नितीशकुमार आमचे नेते आहेत. ‘महाआघाडीत फूट’ या मीडियातून पसरवल्या जाणाºया अफवा आहेत.’, असे लालूंनी काही वेळेपूर्वी म्हटले होते.

राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर लालू यादव म्हणाले, ‘बिहार सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. महाआघाडीत काहीही चलबिचल नाही. सगळ्या मीडियाच्या अफवा आहेत. नितीशकुमारांनी तेजस्वींचा राजीनामा मागितलेला नाही.’ तेजस्वी यादवही म्हणाले की मला कधीही राजीनामा मागितला गेला नाही. नितीशकुमारांनीही आज आमदारांची बैठक बोलावली आहे. लालू यादव व त्यांच्या कुटुंबावर रेल्वे निविदा घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तेजस्वी यादवांच्या राजीनाम्याची भाजपने मागणी केली होती. जेडीयूचे म्हणणे होते की तेजस्वी यांनी जनतेसमोर स्पष्टीकरण द्यावे.

Related posts

मला निवडणूक आयोगाकडून शून्य अपेक्षा आहे !

News Desk

पुन्हा रेल्वे अपघातात, 74 गंभीर जखमी 

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत, राहुल गांधींचा आरोप

News Desk