HW News Marathi
क्राइम

वाशिम जिल्हा कृषी विकास अधिकारी धापाते लाच घेतना रंगे हात अटक

विनोद तायडे

वाशीम-वाशिम जिल्ह्या परिषद जिल्हा कृषी विकास अधिकारी

आबा गेनबा धापाते यांना

एचडीपीई पाईपचे 17 लाख रूपयाचे बील काढण्यासाठी लाच घेत असताना रंगे हात अटक एसीबीने केली आहे .

या संदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहिती नुसार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एचडीपीई पाईप तयार करणार्‍या कंपनीने वाशीम जिल्हा परिषद ला 2016 ला पाईप पुरवठा केला होता. त्याचे जवळपास 17 लाख रूपयाचे बील काढण्याकरीता 19 टक्के प्रमाणे 3 लाख 20 हजार रुपये रक्कमेची मागणी करीत असल्याची तक्रार तक्रारकर्त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. शेवटी 16 टक्के 2 लाख 74 हजार रुपये प्रमाणे देण्याचे निश्‍चित झाले. आबा धापते यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराची लाच स्वीकारली नाही. पण तक्रारदाराकडून आपण लाच मागतल्याचे त्यांनी माण्य केल्यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच लुचपत प्रतिबंधक कायदा 1988 कलम 7, 15 क्रमाने गुन्हा दाखल करत धापते यांना ताब्यात घेतले. सदर कार्यवाही महेश चिमटे पोलिस अधीक्षक,विलास देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती,आर व्ही गांगुर्डे पोलिस उपअधीक्षक वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एन बी बोर्हाडे व त्यांच्या पथकाने केली

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पाच तोतया युवकांना पोलीसांनी केली अटक

News Desk

धक्कादायक! बीडच्या तरुणानं तुरुंगात बसून ५ देशातल्या लोकांना घातला कोट्यावधींचा गंडा

News Desk

जोगेश्वरीत वयोवृद्ध पती पत्नीवर धारधार शस्त्राने हल्ला; पतीचा मृत्यू; पप्पू नोकराला अटक

Chetan Kirdat
महाराष्ट्र

अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायकलवरून वाटले सातबारा

News Desk

अकोला – मंगळवारी महसूल दिनानिमित्त स्वत: येथील जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय शेतकऱ्यांच्या वेषात अकोला तालुक्यातील चांदूर गावात सायकलने गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांना संगणकीकृत सात-बारा उताऱ्यांचे वितरण केले.

सात-बारा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे शासनाने सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला. काही जिल्ह्यांत हे काम अद्याप अपूर्ण असले, तरीही अकोला जिल्ह्यात ते पूर्ण झाले असून, हा संगणकीकृत सात-बारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी सायकलने चांदूर गावात पोहचले. या वेळी त्यांनी संगणकीकृत सात-बाराचे शेतकऱ्यांना वितरण केले. शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेणे व त्यांचे मनोधैर्य वाढविणे, हादेखील या उपक्रमामागील उद्देश आहे.

Related posts

संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार!

News Desk

सांगली जिल्ह्यातील बाबरवस्ती शाळा आदर्श पुरस्काराने सन्मानित

News Desk

MPSC पुस्तके तोंडावर फेकून आंदोलन करणार ! राम सातपुतेंचा इशारा

News Desk