HW News Marathi
क्राइम

४८ तासांत १० घरफोड्या

पनवेल: गेल्या 48 तासात करंजाडेसह पनवेलमध्ये जवळपास 10 च्या वर घरफोड्या झाल्याने स्थानिक रहिवाशी भयभित झाले असून घरफोडी करणारी टोळीच पनवेल शहरात ठाण मांडून बसलीय आहे का? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. दरम्यान पनवेल शहर पोलिसांना या संदर्भात काही धागेदोरे व संशयित आरोपींची माहिती मिळाली आहे.

शहराजवळील करंजाडे येथे दुध सेंटर, मेडीकल स्टोअर्स याच्यासह पनवेल शहरातील चप्पलवाले, मेडीकल स्टोअर्स, बिस्किट विक्रेता, फोटो स्टुडिओ तर काही घरातील किरकोळ भांडी चोरून नेल्याची घटना गेल्या 48 तासात घडली आहे. यामध्ये साधारण ऐवजासह रोख रक्कम मिळून जवळपास लाखो रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला आहे. याबाबत काही जणांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या असून काही जणांनी अद्यापपर्यंत किरकोळ नुकसान झाल्याने तक्रारी केल्या नसल्याचे समोर आले आहे. अशा मिळून जवळपास 10 च्या वर घरफोड्या पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या आहेत. या संदर्भात पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी ठसे तज्ञ पाचारण करण्यात आले असून त्या आधारे या सराईत घरफोडी करणाºया टोळीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फेक TRP प्रकरणी Republic Tvच्या दोन अधिकाऱ्यांना समन्स ! अडचणींत वाढ…

News Desk

झरेवाडीच्या रंगीला बाबा अखेर अटकेत

News Desk

कार्यालयात होणाऱ्या शोषणाबाबत महिलांचे मौन

News Desk
महाराष्ट्र

अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायकलवरून वाटले सातबारा

News Desk

अकोला – मंगळवारी महसूल दिनानिमित्त स्वत: येथील जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय शेतकऱ्यांच्या वेषात अकोला तालुक्यातील चांदूर गावात सायकलने गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांना संगणकीकृत सात-बारा उताऱ्यांचे वितरण केले.

सात-बारा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे शासनाने सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला. काही जिल्ह्यांत हे काम अद्याप अपूर्ण असले, तरीही अकोला जिल्ह्यात ते पूर्ण झाले असून, हा संगणकीकृत सात-बारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी सायकलने चांदूर गावात पोहचले. या वेळी त्यांनी संगणकीकृत सात-बाराचे शेतकऱ्यांना वितरण केले. शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेणे व त्यांचे मनोधैर्य वाढविणे, हादेखील या उपक्रमामागील उद्देश आहे.

Related posts

संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार!

News Desk

सांगली जिल्ह्यातील बाबरवस्ती शाळा आदर्श पुरस्काराने सन्मानित

News Desk

MPSC पुस्तके तोंडावर फेकून आंदोलन करणार ! राम सातपुतेंचा इशारा

News Desk