HW News Marathi
क्राइम

पुण्यात भामट्याने थाटले चक्क एसीबीचे बोगस कार्यालय

पुणे | लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आणण्याच्या नावाखाली एका भामट्याने भपकेबाज कार्यालय थाटून हप्तेवसुली आणि खंडणीखोरीचा गोरखधंदा चालविल्याचे प्रकरण पुण्यात उघडकीस आले आहे. एसीबीने या भामट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या भामट्याने सिंहगड रस्त्यावरील वडगाव येथे‘अ‍ॅन्टी करप्शन इन्व्हीस्टिगेशन ब्युरो’ नावाने एक कार्यालयउघडले होते. ते कार्यालय शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अर्थात एसीबीचेच असल्याचे तो लोकांना सांगत असे. तसेच लोकांकडून सभासद फी घेऊन लाचखोरांवर कारवाईचे अधिकार तुम्हाला दिल्याचे सांगत असे. दिलीप लक्ष्मण चौगुले (फ्लॅट ११८, रिलायबल पार्क,गोडोली, सातारा) असे आरोपीचे नाव असून त्यालाफसवणुकीच्या आरोपांवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

वडगाव येथे सुजय कॉम्प्लेक्स येथे अ‍ॅन्टी करप्शन इन्व्हीस्टिगेशन ब्युरो नावाने कार्यालय उघडून काही जणांकडून १००० रुपये घेत कारवाई करण्याचे अधिकार देण्याचे आमिष चौगुले दाखवत होता. एसीबी पथकाने चौगुले याच्या कार्यालयाची झडती घेऊन काही कागदपत्रे जप्त केली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेना पदाधिकारच्या कारने शाळकरी मुलींनी चिरडले

News Desk

जितेंद्र आव्हाडांच्या जामीन अर्जावर लवकरच निकाल

Aprna

बंदुकीच्या धाकावर बलात्कार

News Desk
देश / विदेश

उत्तर प्रदेशातील भीषण रेल्वे अपघातात 23 ठार

News Desk

मुजफ्फरनगर :उत्तरेत झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने देशभरात थरकाप उडाला आहे. पुरी-हरिद्वार उत्कल एक्सप्रेस चे 14 डब्बे रुळावरून घसरून शनिवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला. यात 40 जण जखमी झाले आहेत. मुजफ्फर नगर जिल्ह्यात खतौली येथे झालेल्या या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.

सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना तत्काळ मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या. सुरेश प्रभू यांनी टिष्ट्वट करून, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती दिली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना मदत आणि बचावकार्याची देखरेख करण्यास सांगितले आहे. एनडीआरएफच्या तुकड्या गाझियाबादमधून मदतीसाठी रवाना झाल्या आहेत. मेडिकल व्हॅनही येथे पोहोचल्या आहेत.

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Related posts

कर्नाटकमध्ये क्रेन कोसळून सहा जणांचा जागीच मृत्यू

News Desk

तुम्ही भले कंगनाच्या मताशी सहमत नसाल पण…! | देवेंद्र फडणवीस

News Desk

तापमान बदलल्याने कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ

News Desk