HW News Marathi
क्राइम

श्री रेणुकामाता मंदिर परिसरात कार-बसचा भीषण अपघात

चांदवड | श्री रेणुकामाता मंदिराजवळील मुंबई-आग्रा महामार्गावर बंद असलेल्या बसला पाठीमागून कार धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. कारचे टायर फुटल्याने ती बसवर जाऊन आदळली हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात वणी येथील एकाच कुटूंबातील तिघे जागीच ठार झाले.

वणी येथील सप्तशृंग पतसंस्थेचे संचालक संजय समदडीया, पत्नी वंदना समदडीया व मुलगा हिमांशु समदडीया अशी मृतांची नावे आहेत. धुळे येथे नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यासाठी ते गेले होते. विवाहसोहळा आटोपून वणी येथे परतत असताना हा अपघात झाला. फोर्ड फिगो या कारमधून ते परतीचा प्रवास करत होते. या घटनेमुळे वणी शहरावर शोककळा पसरली आहे. संजय समदडीया यांचे समवेत प्रवास करणारा दुसरा मुलगा जखमी असून चांदवडच्या रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१७ दिवसांनंतर आज जामिनावर आर्यन खान येणार कोठडीतून बाहेर?

News Desk

3 लाख चोरी करणारे आरोपी अटक

News Desk

ट्रॅव्हल्समधील अश्लील व्हिडिओ प्रकरणी, भाजपच्या पदाधिकाऱ्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी

News Desk