HW News Marathi
क्राइम

भाजप नगरसेवकाची पोलीस अधिकाऱ्याला जबर मारहाण

मेरठ | मेरठमधील कंकरखेडा येथील एका हॉटेलच्या मालक आणि पोलीस अधिकारी यांच्या झालेल्या वादानंतर भाजप नगरसेवक मनीष कुमार याने एका पोलीस अधिकाऱ्याला जबर मारहाण केली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमधील भाजप नगरसेवक मनीष कुमार याने एका पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

पोलीस अधिकारी एका महिला वकिलांसोबत जेवण करण्यासाठी त्या हॉटेलमध्ये आले होते. यावेळी काही कारणास्तव हॉटेल मालक आणि त्या पोलीस अधिकाऱ्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर त्या हॉटेल मालकाने तेथील भाजप नगरसेवक मनीष कुमारला बोलवून घेतले. भाजप नगरसेवक तेथे आल्यानंतर त्याने पोलीस अधिकाऱ्याशी वाद घातला. त्यानंतर चक्क पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करायला सुरुवात केली, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, आरोपी मनीष कुमारला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दोन सख्या बहिणींना ब्लॅकमेल करून केला बलात्कार

News Desk

मजबुरी का नाम कोण?

News Desk

पालघर- युवकाची  लोकल खाली आत्महत्या

News Desk
मुंबई

पोलिसांनी घटना वाचण्याची गरज | निखिल वागळे

News Desk

मुंबई | आज मुंबईत संविधान सन्मान यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. ही यात्रा वीर कोतवाल उद्यान ते चैत्यभूमी अशी काढण्यात येणार होती. पण पोलिसांनी या यात्रेला परवानगी नाकारली. त्यामुळे ही यात्रा चैत्यभूमी येथे घेण्यात आली. यावेळी निखिल वागळे यांनी पोलिसांवर टीका केली. ते म्हणाले, पोलिसांनी मिरवणुकीला परवानगी नाकारली हे अत्यंत चुकीच आहे. पोलीस कायद्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करतात. पोलिसांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे हे राज्य घटनेनुसार चालते. त्यांच्या वर्दीनुसार चालत नाही. पोलिसांचा मी निषेध करतो.पोलिसांनी घटना वाचण्याची गरज आहे.

पुढे म्हणाले, शांतपणे आंदोलन करण्याचा अधिकार नागरिकांना घटनेने दिला आहे. या विभागाचे डीसीपी असतील त्यांनी घटना वाचा कायदा वाचा, तुमची पोलिसी वृत्ती सर्व सामान्य नागरिकांवर दाखवू नाका. मेळावे आणि राजकीय मोर्च्याला परवानगी दिली जाते. पण बाबासाहेबांनी घटना लिहली, त्या बाबासाहेबांच्या चैत्यभूमीत अंगणात यायला आम्हाला पोलिसांची परवानगी मिळत नाही. ही एनएपीएम ने काढलेली संविधान सन्मान यात्रा आहे. आणि ती दांडी पासून दिल्लीला जाणार आहे. आणि मी अशासाठी सामील झालो आहे. संविधान वाचवण्याचा कार्यकर्त्यांचा एक प्रयत्न आहे. आणि माझ्या मते तो महत्वाचा आहे. महत्वाचा अशासाठी की संविधानावर काही ना काही मार्गाने हल्ला होतोय.

सरकारकडून होतोय, पोलिसांकडून होतोय तरी शेतकऱ्यांवर लाठीमार केला जातोय. कधी कामगारांना तुरुंगात टाकले जाते. कधी मानवी हक्क कार्यकर्त्यांना युएपीए लावून जेलमध्ये टाकले जाते. त्यामुळे संविधान वाचवणं महत्वाचं आहे. आणि नागरी स्वातंत्र्याच्या बाजूने मी कायम उभाराहिलो आहे. म्हणून इथे मी पाठींबा द्यायला आलो आहे.

Related posts

कुलगुरूंना हटवताना राज्यपाल दबावाखाली होते का-मुणगेकर यांचा सवाल

News Desk

सायन रुग्णालयातील डॉक्टर आज संपावर

News Desk

जाणून घ्या…कसे आहे व्हॉट्सअॅपचे नवे फिचर

News Desk