HW News Marathi
क्राइम

धावत्या ट्रेनमध्ये चोरट्याने बॅग खेचल्याने महिला ट्रेनखाली पडून महिलेचा मृत्यू

नवी दिल्ली चोराने बॅग खेचण्याचा प्रयत्न केल्यानंतर झालेल्या झटापटीत ट्रेनमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकावर घडली.

पीडित महिला सुधीर बंसल आपला मुलगा गौरवसबोत ट्रेनने प्रवास करत होत्या. गौरवला दिल्ली विद्यापिठात प्रवेश मिळाला होता. त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने आई आणि मुलगा दिल्लीत फिरत होते. त्यांनी राजस्थानहून योगा एक्स्प्रेस ट्रेनने प्रवास सुरु केला होता. सुधीर बंसल प्रवासावेळी दरवाजाजवळ उभ्या होत्या. मिठाई पुलावर पोहोचल्यानंतर ट्रेनचा वेग कमी झाला होता, नेमकी हीच संधी साधत चोराने सुधीर बंसल यांची बॅग खेचण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सुधीर यांनी चोराशी झटापट केली, आणि त्या ट्रेनमधून खाली पडल्या. ट्रॅकवर पडल्यानंतर रेल्वेच्या चाकाखाली आल्याने त्या जखमी झाल्या. गौरवने आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला अपयश आलं. गंभीर जखमी झालेल्या सुधीर बंसल यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. चोर मात्र बॅग घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला. बॅगेत काही कॅश, कागदपत्रं आणि एटीएम कार्ड होते अशी माहिती त्यांची मुलाने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“एकाच घरावर कितीवेळा छापे मारणार?”- जयंत पाटील

News Desk

दोन अधिका-याच्या पत्नीमधील भांडणाने सैन्याची नाचक्की

News Desk

आरोपीची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या

News Desk
राजकारण

पालघरमध्ये भाजप विजयी

News Desk

पालघर | देशाचे लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा गुरुवारी निकाल लागला. कॉंग्रेस मधून भाजपात आलेले राजेंद्र गावित हे या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार होते तर दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यामुळे या चुरशीच्या लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते.गुरुवारी लागलेल्या निकालानुसार राजेंद्र गावित यांना जवळपास २ लाख ७२ हजार ७८२ मते मिळवली तर दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना सुमारे २ लाख ४३ हजार २१० मते मिळाली आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तासच आधी भाजपात आलेले तरीही लोकप्रिय म्हणून मतदानातून सिद्ध झालेले राजेंद्र गावित पालघर मध्ये जास्तीत जास्त मतांनी विजयी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. भाजपचे खासदार चिंतामन वनगा यांच्या निधनामुळे इथे पोटनिवडणूक घेण्यात आली होती. परंतु त्यांच्याच मुलाला शिवसेनेने उमेदवारी देऊनही जनतेने वनगांच्या बाजूने कौल न दिल्यामुळे ते ही तितकेच चर्चेचा विषय ठरले आहेत.

पालघरमध्ये गावित यांच्या विजयामुळे शिवसेनेला चांगलाच धक्का लागल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. विजयानंतर या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. परंतु, आजच भाजपचे वरिष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे निधनाझाल्यामुळे जल्लोष साजरा न करण्याचा आदेश पक्षाच्या वतिने देण्यात आले आहेत. गावित विजयी झाले असले तरी निवडणूक आयोगाकडून याबाबत औपचारिक घोषणा करणे बाकी आहे.

 

Related posts

 नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी | कमल हसन

News Desk

नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज ठाकरेंनी घेतला भाजप सरकारचा समाचार

Gauri Tilekar

प्रकाश आंबेडकरांचा महत्वपूर्ण निर्णय

News Desk