HW News Marathi
क्राइम

धावत्या ट्रेनमध्ये चोरट्याने बॅग खेचल्याने महिला ट्रेनखाली पडून महिलेचा मृत्यू

नवी दिल्ली चोराने बॅग खेचण्याचा प्रयत्न केल्यानंतर झालेल्या झटापटीत ट्रेनमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकावर घडली.

पीडित महिला सुधीर बंसल आपला मुलगा गौरवसबोत ट्रेनने प्रवास करत होत्या. गौरवला दिल्ली विद्यापिठात प्रवेश मिळाला होता. त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने आई आणि मुलगा दिल्लीत फिरत होते. त्यांनी राजस्थानहून योगा एक्स्प्रेस ट्रेनने प्रवास सुरु केला होता. सुधीर बंसल प्रवासावेळी दरवाजाजवळ उभ्या होत्या. मिठाई पुलावर पोहोचल्यानंतर ट्रेनचा वेग कमी झाला होता, नेमकी हीच संधी साधत चोराने सुधीर बंसल यांची बॅग खेचण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सुधीर यांनी चोराशी झटापट केली, आणि त्या ट्रेनमधून खाली पडल्या. ट्रॅकवर पडल्यानंतर रेल्वेच्या चाकाखाली आल्याने त्या जखमी झाल्या. गौरवने आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला अपयश आलं. गंभीर जखमी झालेल्या सुधीर बंसल यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. चोर मात्र बॅग घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला. बॅगेत काही कॅश, कागदपत्रं आणि एटीएम कार्ड होते अशी माहिती त्यांची मुलाने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

१७ दिवसांनंतर आज जामिनावर आर्यन खान येणार कोठडीतून बाहेर?

News Desk

सांगली साधू मारहाण प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना घेतले ताब्यात

Aprna

दिव्यांश सिंग प्रकरणात गुन्हा दाखल

News Desk
क्राइम

संघ मुख्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

News Desk

नागपूर : रॉकेलची बाटली हातात घेऊन एका युवकाने महालमधील शनिवारी सायंकाळी संघ मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. वेळीचसीआयएसएफच्या जवांनानी त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. बेरोजगारीला कंटाळून हा युवक संघ मुख्यालयासमोर आत्मदहनकरण्याच्या प्रयत्नात होता, असे सांगण्यात येते. या घटनेची नोंद कोतवाली पोलिसांनी केली असून, त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन केलेआहे. संतोष, असे या युवकाचे नाव आहे.

संतोष हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तो बीटेक झाला आहे. उच्च शिक्षित असतानाही त्याला नोकरी मिळाली नाही. त्यानेतेथील प्रशासनाला वेळोवेळी नोकरी मिळण्याबाबत विनवणी केली. त्याला कोणीही दाद दिली नाही. त्यामुळे तो हताश झाला होता.

‘मी उच्च शिक्षत आहे, मला नोकरी मिळत नाही. उत्तर प्रदेश प्रशासन मला न्याय देत नाही, संघ मुख्यालयात मला न्यायमिळेल, या मुळे मी येथे आलो आहे’,असे तो सांगत होता. सीआयएसएफच्या जवानांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली.

Related posts

पोलिस ठाण्याच्या उद्घाटनानंतर पहिली तक्रार स्थानिक आमदारा विरोधातच

News Desk

तक्रार दिल्यानंतर परत शहरात फिरण्याची काय आवश्यकता? याचा अर्थ तुम्ही पब्लिसिटी स्टंट करत आहात- सतेज पाटील

News Desk

लोहा येथे तरूणाचा खून

News Desk