HW News Marathi
क्राइम

धुळ्यात पाच जणांची हत्या, २३ जणांना अटक

धुळे | मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून जमावाने पाच जणांची हत्या केली. धुळे पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत २३ जणांना अटक केले आहे. ही घटना साक्री तालुक्यातील राईनपाडा आदिवासी पाड्यात रविवारी १ जुलै रोजी पाच जणांना बेदम मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आली. राईनपाडात रविवारी आठवडी बाजार भरला होता. या बाजारात काही जण फिरत असून हे सर्वजण मुले पळविणारी टोळी असल्याचा संशय पाड्यातील काही लोकांना आला.

या पाच जणांना मारहाण करण्यास सुरुवात केली असून यात या पाच जणांचा मृत्यू झाला. जमावाने या सर्वांना ग्राम पंचायतीच्या कार्यलयात आणून टाकले. भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर मालवे, अगनू इंगोले आणि राजू भोसले ही पाच मृत व्यक्तीची नावे आहेत. धुळे पोलिसांनी या प्रकरणात रविवारी १५ जणांना ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावरील अफवांवर कुणी ही विश्वास ठेवू नका, असे आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छोटा राजनचा शार्प शुटर अटकेत

News Desk

तक्रार मागे घे , नाहीतर टांगून मारेल

News Desk

नांदेड येथे गाेदावरी नदी काठी तरुणाचा खून

News Desk