HW News Marathi
क्राइम

धुळ्यात पाच जणांची हत्या, २३ जणांना अटक

धुळे | मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून जमावाने पाच जणांची हत्या केली. धुळे पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत २३ जणांना अटक केले आहे. ही घटना साक्री तालुक्यातील राईनपाडा आदिवासी पाड्यात रविवारी १ जुलै रोजी पाच जणांना बेदम मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आली. राईनपाडात रविवारी आठवडी बाजार भरला होता. या बाजारात काही जण फिरत असून हे सर्वजण मुले पळविणारी टोळी असल्याचा संशय पाड्यातील काही लोकांना आला.

या पाच जणांना मारहाण करण्यास सुरुवात केली असून यात या पाच जणांचा मृत्यू झाला. जमावाने या सर्वांना ग्राम पंचायतीच्या कार्यलयात आणून टाकले. भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर मालवे, अगनू इंगोले आणि राजू भोसले ही पाच मृत व्यक्तीची नावे आहेत. धुळे पोलिसांनी या प्रकरणात रविवारी १५ जणांना ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावरील अफवांवर कुणी ही विश्वास ठेवू नका, असे आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रणवीर सिंह यांच्या न्यूड फोटोशूटमुळे पोलिसांत गुन्हा दाखल

Aprna

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी महिला कर्मचऱ्यास पोलीस कोठडी, पाच अटकेत

News Desk

डोंबिवली बलात्कार : 33 आरोपींची नावं समोर, आतापर्यंत 28 जण ताब्यात

swarit
महाराष्ट्र

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात तोडफोड

News Desk

पालघर | तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात भरती प्रक्रियेत डावल्यामुळे स्थानिकांनी प्रकल्पाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची तोडफोड केली. या प्रकल्पात भूमीपुत्रांना नोकरी देण्याचे आश्वासन देऊनही त्यांना भरतीपासून दूर ठेवल्याचा आरोप स्थानिकांनी करुन वाहनांची तोडफोड केली आहे.

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात सध्या भरती प्रकिया सुरू झाली आहे. या स्थानिक तरुणांनी नोकरीसाठी कॉल केले होते. परंतु भरतीसाठी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना डावलून बाहेरील लोकांना या भरती प्रक्रियेत प्राधांन्य देत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.

यासाठी स्थानिक रस्त्यावर उतरुन, प्रकल्पासाठी जाणाऱ्या वाहनांना अडवीत आहेत. या व्यतिरीक्त बसच्या काचाही फोडल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Related posts

पुणे मनपा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या पूजा कोद्रे विजय

News Desk

अजित पवार यांनी तिसऱ्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

News Desk

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला भीषण आग, दुकान जळून खाक

News Desk