HW News Marathi
क्राइम

लाखोंची खंडणी वसुलीप्रकरणी आरटीआय कार्यकर्तीला अटक 

कल्याण पूर्वेत राहणाऱ्या एका महिला माहिती अधिकार कार्यकर्तीला अनधिकृत बांधकाम प्रकरणात एका बांधकाम व्यवसायिकाकडून लाखोंच्या खंडणी प्रकरणात ठाणे खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून खंडणी स्वीकारतांना रंगेहात अटक केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. चारुशीला पाटील असे खंडणीखोर महिलेचे नाव आहे.

बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांच्या बांधकामाची कल्याण डोंबिवली महापालिकेत चारुशीला हिने तक्रार केली होती. तक्रार मागे घेण्यासाठी तिने सुरेंद्र यांच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र काही दिवसांनी तिने तडजोड करून ५ लाख रुपये देणेतिला निश्चित करण्यात आले होते. यापैकी २ लाख रुपये चारुशीला हीने आधीच घेतल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. मात्र उर्वरितरक्कमेचा दुसरा हप्ता घेताना ठाणे खंडणी विरोधी पथकाने आज कल्याण पूर्वेतील बाजरपेठेत सापळा रचून खंडणी स्वीकारताना तिला रंगेहाथ अटक केली आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार खंडणीखोर चारुशीला पाटील हिने अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ताजमा केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान ठाणे खंडणी विरोधी पथकाने याप्रकरणी तपासाचे काम सुरु असल्याचे सांगितले असून सांयकाळ पर्यत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“गुजरातमधील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळं”-छगन भुजबळ

News Desk

मामी आणि भाच्याच्या नात्याला काळिमा; साकिनाकात मामाच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक

Aprna

पंजाबमधील शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Aprna
राजकारण

मराठी वाचवण्यासाठी साहित्यिक काय करतात: राज ठाकरे

swarit

सांगली : महाराष्ट्राची स्थिती बिघडली असताना कुठे गेले साहित्यिक? ते भूमिका का घेत नाहीत? का बोलत नाहीत? का लिहीत नाहीत?

जर आजची वेळ निघून गेली की पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. राजकीय भिंतींसह सगळ्या जातीच्या भिंती पाडायला हव्यात. गायकांचे राग वेगळे आणि आमचे राग वेगळे, त्यांचे राग ऐकू वाटतात, पण आमचे राग परवडत नाहीत, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. सांगलीत औदुंबर साहित्य संमेलनात राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, दक्षिणेतील तीन भाषांना अभिजात दर्जा मिळाला, पण मराठीला अजून भाषेचा अभिजात दर्जा मिळाला नाही.

कदाचित गुजराती भाषेला हा दर्जा मिळू शकतो, ते पण अर्ज न करता. राज ठाकरे यांनी यावेळी मोदींवर निशाणा साधला आहे. शहरांची स्थिती काय आहे ? तुम्ही बेसावध आहात. मराठी भाषा टिकावी, पण त्या अगोदर, मराठी माणूस अगोदर टिकला पाहिजे. सांगलीत म्हणे सद्भावना रॅली काढली, पण अशा रॅली काढून सद्भावना येत नाही, तुमच्या मनातून सद्भावना यावी लागते. महाराष्ट्रात काय चाललंय हे कवी आणि साहित्य क्षेत्रातील लोकांनी बोलावं

Related posts

द्रौपदी मुर्मू: भारताच्या 15 व्या राष्ट्रपतींबद्दल माहित नसलेल्या घटना

News Desk

निवडणूक आयोगासमोर शिवसेना आणि धनुष्यबाणावर होणार सुनावणी

Aprna

देशाच्या विविधतेला विरोध करत स्वतःला देशभक्त तर इतरांना देशद्रोही ठरविले जाते !

News Desk