HW News Marathi
क्राइम

सीबीआयकडून युक्तीवाला सुरूवात

मुंबई 1993 साखळी बॉम्बस्फोटप्रकरणातील सहा आरोपींना कोणती शिक्षा ठोठवण्यात यावी यावर सीबीआयने गुरूवारी युक्तवाद केली आहे. या युनक्तिवादात सीबीआयने दोषीवंर कठोर शिक्षेची मागणी विशेष टाडा न्यायालयाकडे केली आहे..

टाडा न्यायालयाने अबू सालेमसह मुस्तफा डोसा, फिरोज खान, करीमुल्ला खान, रियाझ सिद्दिकी आणि ताहीर मर्चंट यांना दोषी ठरवले. या पाच जणांना कोणती शिक्षा ठोठावण्यात यावी, याबाबत विशेष सीबीआय वकील दीपक साळवी यांनी युक्तिवादास सुरुवात केली. सर्वोच्च न्यायालयाने अशा केसेसमध्ये फाशीची शिक्षा ठोठावल्याच्या अनेक प्रकरणांचा हवाला साळवी यांनी विशेष न्यायालयाला दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पालघर- युवकाची  लोकल खाली आत्महत्या

News Desk

कर्नल पुरोहितांच्या याचिकेवर १६ जुलैला होणार सुनावणी

News Desk

अंबानींच्या कुटुंबीयाना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात

Aprna
मुंबई

नेवाळीतलं शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलं

News Desk

कल्याण – नेवाळी परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जागेवर पेरणी करण्यासाठी रोखण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक स्वरूप आलंय. कल्याण-नेवाळी परिसरातील शेतकऱ्यांची जमीन सरकारनं बळजबरीनं संपादीत केली होती. त्याविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनानं हिंसक स्वरूप धारण केलंय. मलंगगडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हे आंदोलन सुरू कऱण्यात आलंय. यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या काही गाड्या पेटवून दिल्याची माहिती समोर येतेय. तसंच काही पोलिसही यावेळी जखमी झाल्याची माहिती पुढं येतेय.

तत्कालीन इंग्रज सरकारनं मलंग रोडवरील नेवाळी येथील १,६०० एकर जागा ताब्यात घेतली होती. त्यातील काही जागा शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे तर बहुतांश जागेवर अतिक्रमण झालंय. त्यामुळं या जागेवर संरक्षण विभागाचा की स्थानिक शेतकऱ्यांचा हक्का आहे, याविषयी संभ्रम कायम आहे. या जागेच्या मालकीबाबत कोणतीही माहिती प्रशासनाकडून दिली जात नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. ही जागा केंद्र सरकारने अजूनही शेतकऱ्यांना परत केलेली नाही. या जागेवर आता नौसेनेने ताबा घेतला आहे. तेथे संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. नेवाळी येथे विमानतळ होणार होते. मात्र, नियोजित विमानतळ नवी मुंबई येथे होत असल्याने आता नौसेनेला ही जागा कशासाठी हवी आहे, असा सवाल बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

नेवाळी परिसरात संपादित केलेली एक हजार ६५० एकर जागा आजपासच्या १८ गावांतील शेतकऱ्यांची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने ही जागा शेतकऱ्यांना परत करणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने ही जागा संरक्षण खात्याकडे वर्ग केली. संरक्षण खात्याने ही जागा नौसेनेला दिली आहे. या जागेवर नौसेनेने संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांच्या जागा परत न करता तेथे संरक्षण भिंत उभारण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

Related posts

शेतकरी कर्जमाफीसाठी उत्तरप्रदेश मॉडेलचा अभ्यास – मुख्मयंत्री

News Desk

मुंबई पोलिसांकडून दाऊदच्या पुतण्याला अटक

News Desk

माओवादी थिंक टँकच्या अटकेबाबत पोलिसांचा मोठा गौप्यस्फोट

News Desk