HW News Marathi
क्राइम

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पोलिसाला बेड्या

अकोला : शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तब्बल वर्षभर बलात्कार करणाऱ्या पोलिसावर जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्यासंदीप आनंद गवई या ४२ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यानेसंबंधित १५ वर्षीय मुलीवर ऑक्टोबर २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत बलात्कार केले. रविवारी पीडितेने याची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात केल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली.

संदीप गवई याने २०१६ च्या दसऱ्याच्या दिवशीतिला घरी बोलावले व मोबाइल नंबर दिला. ‘मला नेहमी फोन करीत राहा. तू फोन केला नाहीस, तर तुझ्या आईला व भावाला मारून टाकीन,’ अशी धमकीही दिली. तेव्हापासून तो सतत बोलत असे. दिवाळीनंतर आई मामाच्या घरी गेल्यानंतर त्याने घरी कुणी नसल्याचे पाहूनतिला बोलावले व बलात्कार केला. त्यानंतर जानेवारी महिन्यात पुन्हा त्याने बलात्कार केला. मी शाळेत जायचे,तेव्हा आरोपी पाठलाग करायचा व जवळीक करण्याचा प्रयत्न करायचा; मात्र त्याला सतत टाळण्याचा प्रयत्न करायचे, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, ४ जुलैच्या रात्री आरोपीने आई घरी असताना हाका मारल्या. आईने विचारणा केली असता, मी आजपर्यंतचा घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर आम्ही पोलीस ठाणे गाठले असेही पीडितेने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नागपुरात पत्रकाराच्या आई-मुलीची अपहरण करून हत्या

swarit

उमरीमध्ये 9 लाखाच्या गुटख्यासह दोघांना केले अटक 

News Desk

उपसरपंचाचा निर्घृण खून

News Desk
देश / विदेश

रद्द केलेल्या तिकीटमधून रेल्वेची १४०० कोटींची बेगमी

News Desk

नवी दिल्ली : रेल्वेचे आरक्षित तिकीट रद्द करण्यासाठीचे शुल्क वाढविल्याचा रेल्वेला चांगलाच फायदा झाला आहे. प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांच्या शुल्कातून रेल्वेने २०१६-१७ या आर्थिक वर्षात तब्बल १४०० कोटी रुपयांची बेगमी केली आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट आरक्षण करण्याबरोबरच आरक्षण रद्द करणेही रेल्वेच्या पथ्यावर पडत आहे.

तिकीट रद्द करण्यासाठीच्या शुल्कामध्ये रेल्वेने नोव्हेंबर २०१५ मध्ये दुप्पट वाढ केली. त्यामुळे वर्षभरात १४00 कोटी रुपयांची कमाई झाल्याची माहीती रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांनी राज्यसभेत दिली. नोव्हेंबर २०१५ पासून प्रवाशाने एसी ३ टियरचे तिकीट ४८ तासआधी रद्द केल्यास १८० रुपयांचे शुल्क आकारण्यास सुरुवात झाली. त्याआधी ही रक्कम केवळ ९० रुपये होते. याच पद्धतीने एसी २

टियरचे तिकिट रद्द केल्यास १०० रुपयांऐवजी २०० रुपये शुल्क आकारणे सुरू झाले. तसेच स्लीपर क्लासमधील कन्फर्म तिकिट रद्द केल्याबद्दल प्रवाशांकडून ६०रुपयांऐवजी १२० रुपये आकारणे सुरू केले आहे आणि सेकंड क्लासचे तिकिट केल्यास त्यासाठी ३० ऐवजी ६०रुपये शुल्कआकारणी सुरू केली आहे.

याशिवाय प्रवाशाने तिकीट रद्द केल्यास रेल्वे त्या आसनावर अन्य प्रवाशांची व्यवस्था करतेच. त्यामुळे तिथेही पैसा मिळतो. त्यापैकी अनेक तिकिटे तत्काळद्वारे घ्यावी लागतात आणि अर्थातच त्यासाठी प्रवाशांना जादा पैसा मोजावा लागतो. यासर्व गोष्टींमुळे रेल्वेचा महसूल वाढत आहे.

Related posts

पैसा व सत्तेने सर्व काही मिळविता येत नाही

News Desk

ते आता पप्पू राहिले नाहीत, गाढवांचे सम्राट झाले आहेत !

News Desk

लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे – प्रकाश जावडेकर

News Desk