HW News Marathi
क्राइम

अल्पवयीव विद्यार्थिंनीचा पाठलाग करून विनयभंग

ठाणे येथे अल्पवयीन विद्यार्थींनी शाळेत जाताना पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कळवा पोलिसांनी विशाल गुप्ता याला अटक केले. आरोपीला आज कोर्टात हजर केले असता. कोर्टाने 10 जुलै पर्यंत पोलिस कोटडी सुनावली आहे. र्विद्यार्थींनीचा पाठलाग करत तिला बनाम करण्याचा धमकी देत तिचा विनयभंग केला आहे. पीडित मुलगी ८ जुलै रोजी शिकवणीवरून घरी येत असताना विशालने घोलाईनगर येथील रस्त्यावर तिला गाठून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला टाळून तिथून जाण्याचा प्रयत्न केला तरी त्याने तिचा पाठलाग करीत विनयभंग केला. त्यानंतर ‘मेरे साथ भाग जा, पढाई लिखाई में क्या रखा है, तू अगर मेरे साथ भागकर नहीं आई तो मैं तेरे को बदनाम कर दूँगा,’ अशीही त्याने तिला धमकी दिली. याप्रकरणी तिने ९ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास अटक केली. पोलीस उपनिरीक्षक कैलास सोनवणे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सांगली साधू मारहाण प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना घेतले ताब्यात

Aprna

शरीरविक्री लावणा-या महिलेस अटक

News Desk

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

News Desk
Uncategorized

रवी शास्रींच्या नावाला सर्वाधिक पसंती

News Desk

मुंबईः भारतीय क्रिकेट संघाचे कोच म्हणून रवी शास्री यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे सूत्राची माहीती आहे. या पदासाठी सहा जण इच्छुक आहे. खरं तर रवि शास्री कोच पदासाठी इच्छुक नव्हते. परंतु कोच पदासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवल्यानंतर शास्री यांच्या नावाची चर्चा वाढली आहे, दहा अर्जापैकी सहा जणांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये रवी शास्री, विरेंद्र सेहवाग, मुडी, सीमन्स, पायबस, राजपूत यांच्याच मुलाखत होण्याची शक्यता आहे. स्काइपीवरून रवी शास्री यांची मुलाखत देखील झाल्याचे वृत्त सध्या वायरल झाले आहे. त्यामुळे भारतीय कोच म्हणून रवी शास्री यांचे नाव निश्चित मानले जात आहे. अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे.

 

Related posts

देशात ६० वर्षांमध्ये काँग्रेसनं काय केलं?, भास्कर जाधवांनी केली मोदींची मिमिक्री

News Desk

#ExitpollMaharashtra : जाणून घ्या…राज्यात कोणाची सत्ता येणार

News Desk

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी १० जुलै पर्यंत अर्ज करू शकता

News Desk