HW News Marathi
मनोरंजन

FLASHBACK 2018 : भारतीय अंध क्रिकेट संघ जगात सरर्वोत्तम

वर्षाची सुरुवात झाली ती यंदा एका अतिशय आनंददायी घटनेने. भारतीय क्रीकेट जगतासाठी ही अतिशय उत्साहपुर्ण अशी घटना होती. भारताच्या अंध क्रिकेट संघाने ब्लाइंड क्रिकेट वर्ल्ड कप आपल्या नावे केला. विषेश म्हणजे भारतीय संघाने या वर्ल्ड कपमध्ये आपला कायमच प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला २ विकेट ने हरवून विश्वकप आपल्या नावे केला. अभिमानाची बाब म्हणजे भारतीय अंध क्रिकेट संघाने हा विश्वकप दुसऱ्यांदा आपल्या नावे केला आहे.

पहीली खेळी पाकिस्तानने करत भारतीय संघापुढे ८ गडी गमावून ३०७ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने दमदार खेळी करत ३८.४ ओवर मध्येच दोन गडी राखुन पाकीस्तानवर दमदार विजय मिळवला.

असा होता भारत पाकीस्तानचा हा सामना

पाकीस्तानने पहीली खेळी करत ३०७ धावांचे आव्हान भारतीय संघापुढे ठेवले होते. पाकीस्तानने ८ गडी गमावून हे आव्हान उभे केले होते. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा कर्णधार अजय रेड्डी याने ६० चेंडूत ६२ धावा केल्या तर खेळाडू रमेश याने ६७ चेंडूत ९३ धावा केल्या. प्रकाश आणि व्यंकटेश यांनी खेळाची दमदार सुरुवात केली. या दोघांनीही प्रति ओवर १० धावांच्या गतीने स्कोर बनवत भारतीय संघाला विजयाचा मुकूट घालण्यास मोलाची भर घातली.

व्यंकटेशने ३२ चेंडूत ३५ धावा केल्या तर प्रकाश ने ४२ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. २०१४ मध्ये सुध्दा याच भारतीय संघाने दक्षिण अफ्रीकेच्या केप टाउन मध्ये पाकीस्तानलाच हरवून विश्वकप जिंकला होता. काही दिवसांपुर्वी इंग्लडच्या क्रिकेट संघाचा कर्णधार एड हॉसेल यांने भारतीय अंध क्रिकेट संघ हा जगातला सर्वोत्तम संघ असल्याचे म्हणत भारतीय अंध क्रिकेट संघाचे कौतुक केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महिला दिनी या पुरूषाला मिळणार,’सर्वोत्कृष्ट आई’चा सन्मान…

Arati More

#IndianNavyDay : जाणून घ्या… कसे आहे आपले भारतीय नौदल

News Desk

किंग खानच्या ‘झीरो’ सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील

News Desk
देश / विदेश

तुम्हाला हव्या त्या वस्तू खरेदी करा, निघून जा !

News Desk

नवी दिल्ली | वाढत्या तंत्रज्ञानासह भारतात स्वायत्त किरकोळ स्टोअरची संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. वॉटसेल नावाचे अशाच प्रकारचे पहिले दुकान कोचीमध्ये उघडले आहे. या दुकानांबाबत एक विशेष म्हणजे या दुकानात विक्रेते किंवा रोख रजिस्ट्रार नाहीत. या दुकानात ग्राहकांना आवश्यक असलेल्या गोष्टी उचलण्याची परवानगी आहे.

वॉटसेल या दुकानात खरेदी करण्यासाठी सर्व ग्राहकांना वॉटसेल अॅप डाउनलोड करून क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.ग्राहकांना या दुकानामध्ये प्रवेश करण्यास एक पास देण्यात येतो. या दुकानामध्ये वस्तूंच्या दोन पंक्ती आहेत. ज्यात अन्न व पेय पदार्थ तसेच टॉयलेटरीज समावेश आहे. या पंक्तीमध्ये निश्चित केलेले सेन्सर उचलल्या जाणाऱ्या उत्पादनांची स्वयंचलितपणे नोंद घेतली जाते. ग्राहक दुकानातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या फोनवर बिल तयार केले जाते. जे बिल त्यांना ऑनलाइन भरता येते. ही कंपनी दुकानामध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्री लोडेड वॉलेट प्रदान करण्यासाठी काम करीत आहे.

कोचीच्या ५ अभियंत्यांनीची ही संकल्पना आहे. २०१५ पासून ते या विषयावर काम करीत आहेत. त्यांनी यापूर्वी विविध मॉडेलवर संशोधन आणि प्रयोग केले आहे. हे स्टोअर कोणत्याही बाह्य निधीशिवाय लॉन्च केले गेले आहे. परंतु, ही कंपनी नवी दिल्ली आणि बंगलोरमध्ये समान स्टोअर लॉन्च करण्यासाठी गुंतवणूक शोधत आहे. वॉटसेलला मित्सुई अँड कंपनीकडून गुंतवणूकसाठी ऑफर देखील मिळाली आहे. त्यामुळे आता भारतात सुपरमार्केटची संकल्पना देखील लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी देशाला संबोधित करणार

News Desk

जेएनयू हल्ल्यात आइशी घोषसह ९ जण संशयित आरोपी, दिल्ली पोलिसांची माहिती

News Desk

उद्धव ठाकरे अन् अजित पवारांची केंद्राच्या अर्थसंकल्पाविरोधात तीव्र नाराजी

News Desk