HW News Marathi
मनोरंजन

भाऊबीजेच्या सणामागची कथा तुम्हाला माहिती आहे का ?

भाऊबीज म्हणजे भावा -बहिणीच्या प्रेमळ नात्याचा उत्सव. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीये दिवशी असतो. या दिवसाला यमद्वितीया असेही देखील म्हणतात. तर हिंदीत या सणास भाईदूज असे म्हटले जाते. पश्चिम बंगालमध्ये भाई फोंटा या नावाने हा उत्सव साजरा केला जातो. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नेपाळमध्ये देखील हा दिवस भाईतिहार म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.

भाऊबीजेच्या दिवशी बहिणी आपल्या भावांना गोडाच्या जेवणाचे आमंत्रण देतात. बासुंदी-पुरी हा या दिवसाचा खास बेत असतो. आपल्या भावाला ओवाळून बहिणी त्याच्या कपाळी कुंकवाचा टिळा लावतात. हा टिळा आपल्या भावाच्या दीर्घ आणि आनंदी जीवनासाठी असतो. संध्याकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्राला आणि त्यानंतर आपल्या भावाला ओवाळते. बहिणीने ओवाळल्यानंतर भाऊ ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचे कौतुक करतो.

भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पुजा करतात. भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो दीर्घायुषी व्हावा हा यामागे हा खरा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे, कापड, दागिना अशा वस्तू ओवाळणी म्हणून देतो. या दिवशी सख्खा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चंद्राला ओवाळण्याची पद्धत आहे. म्हणूनच आपण लहान मुलांना चंद्राला चांदोमामा अशीच हाक मारायला शिकवतो.

भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात ?

भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात या मागे एक कथा सांगितली जाते. कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पुजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्यास त्यावर्षी तरी यमापासून भय नसते असे मानतात.

यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की, यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा अखेर देवाने दिवस संपला असे भासविण्यासाठी रात्र निर्माण केली. मग यमीला भावाच्या मृत्यूमुळे झालेले दुःख थोडेसे हलके झाले. तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली, अशी कथा आहे. आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभावे यासाठी बहिणीने यमराजाची पुजा आणि प्रार्थना करायची असते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारळाच्या करंज्या

News Desk

महिला दिन आणि विचार करायला लावणारे प्रश्न…!

News Desk

प्रियांका -निक ‘रोका’ सेरेमनीचा फोटो व्हायरल

News Desk