HW News Marathi
राजकारण

गोव्यात ४० फुटांच्या आकाशकंदीलाची चर्चा

गोवा । दिवाळीमध्ये पणत्या आणि आकाश कंदील पेटवून पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. यंदा गोव्यातील एक आकाशकंदील पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता वाढली आहे. ४० फूटाचा हा आकाशकंदील असल्याने साऱ्यांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे.गोव्यात राजधानी पणजीमधील मळा भागात यूथ ऑफ पोर्ताइज मंडळाने तब्बल ४० फूटी आकाशकंदील बनवला आहे. हा कंदील सर्वांसाठी आकर्षण ठरणार आहे. गेले १५ दिवस मंडळाचे कार्यकर्ते त्यासाठी राबत होते. मंडळातर्फे दरवर्षी भला मोठा आकाश कंदील बनवून दिवाळी साजरी केली जाते.

यंदा मंडळाने १ लाख खर्च करून ४० फूटी आकाशकंदील बनवला आहे. गोव्यात दिवाळीला भले मोठे नरकासूर बनववून त्याचे दहन करण्याची परंपरा आहे. गावागावात सध्या तरुण मंडळी अवाढव्य आणि आक्राळ विक्राळ नरकासूर बनवण्यात दंग असताना या मंडळाने मात्र वेगळा असा ४० फूटी आकाशकंदील साकारला आहे.विशेष म्हणजे हा आकाशकंदील एका चर्च समोर उभारण्यात आला आहे. सर्वधर्मीय लोक त्यात सहभागी होत असल्याने त्यातून राष्ट्रीय एकात्मता देखील वाढीस लागत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन केलेली समिती सरकारच्या हातचे बाहुले | राजू शेट्टी

News Desk

कितीही चौकशी केल्या, तरी माझे तोंड बंद होणार नाही !

News Desk

मराठा-धनगर आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांची कोंडी

News Desk
राजकारण

मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे म्हणता म्हणजे शंकेची पाल चुकचुकतेच !

News Desk

मुंबई । कार्तिक एकादशीला काहीजण पाऊस पडू दे म्हणतात. परंतु सभागृहनेते चंद्रकात पाटील यांनी मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे असे साकडे घातले. यावरूनच शंकेची मनात पाल चुकचुकू लागली आहे. त्यामुळे आमची मागणी आहे जो अहवाल असेल तो पटलावर ठेवावा. जर ठेवला नाही तर सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला दिला आहे.

आमची सर्व विरोधी पक्षाची भूमिका हिच आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मागास आयोगाने ज्या शिफारसी दिल्या आहेत. त्या मुख्यमंत्र्यानी स्पष्टपणे वाचून दाखवल्या नाहीत. मागास आयोगाच्या शिफारसी वाचून दाखवण्यापेक्षा संपूर्ण अहवाल दाखवावा अशी मागणी अजितदादा पवार यांनी केली. २९३ चा प्रस्ताव हा सरकारचा अभिनंदन करणारा आहे. परंतु आमचा त्याला विरोध आहे. फिल्डवर ज्या अडचणी लोकांना येतात ते वास्तव आम्हाला सभागृहामध्ये मांडायचे आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला परंतु त्यामध्ये अनेक तालुक्यांचा समावेशच करण्यात आलेला नाही. यासर्व गोष्टी आम्हाला सरकारच्या लक्षात आणून द्यावयाच्या आहेत. आज सकाळपासून आम्हाला सभागृहामध्ये ही चर्चा करायची होती परंतु मुख्यमंत्री सभागृहात आलेले नाहीत. हे आमच्या डोक्यावर यांचे खापर फोडतील म्हणून आम्हाला काही गोष्टी समजल्या पाहिजेत. त्यामुळेच मी सभागृहात वक्तव्य केल्याचा खुलासा अजितदादा पवार यांनी केला.

मागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे…

सभागृहामध्ये नुसती वांजोळी चर्चा करून काही फायदा नाही. मागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे. आम्ही म्हणतोय टीसचा अहवाल पटलावर ठेवा. त्यामुळे त्यात काय आहे ते तरी कळेल. धनगड आहे की धनगर आहे हे तो अहवाल समोर आल्यावर कळणार आहे असेही अजितदादा पवार म्हणाले.

Related posts

“राष्ट्रवादीचा एक मोठा नेता लवकरच देशमुख आणि मलिकांना भेटणार”, कंबोज यांचे खळबजनक ट्वीट

Aprna

“अरे मी बाहेर वॉशरूमला गेलो…”, नाराजीच्या चर्चेवर अजित पवारांचे स्पष्टीकरण

Aprna

“…मी दुसरी शिवसेना मानत नाही”, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

Aprna