HW News Marathi
मनोरंजन

भारतीय परंपरेचा ठेवा मुंबईकरांच्या भेटीला

मुंबई | हातमाग क्षेत्रामध्ये भारतीय कलाकार अत्यंत उच्च दर्जाचे मानले जातात. भारतीय हातमागाला जागतिक पातळीवर एक वेगळाच दर्जा आहे. मात्र असे असून सुद्धा निव्वळ विपणन कलेत तरबेज नसल्याने हे कलाकार जागतिक स्पर्धेत आपल्याला दिसत नाही. कलाकारांची ही व्यथा लक्षात घेऊन या कलाकारांसाठी आर्ट एक्स्पो संस्थेच्या उज्वल सामंत यांनी काळा घोडा येथील कुमारस्वामी सभागृह येथे प्रदर्शन आयोजित केले आहे.२१ नोव्हेंबर २०१८ ते २४ नोव्हेंबर २०१८ यादरम्यान सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे. उत्पादक आणि डिझायनर्स थेट तुमच्या भेटीला असणार आहेत

या प्रदर्शनामध्ये संपूर्ण भारतातील हातमाग व हस्तकलेमध्ये वाकबगार असणारे विविध कलाकार आपली कला सादर करणार आहे. यामध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या वस्त्रनिर्माते आणि डिझायनर्सचा समावेश आहे. अनोखे भारतीय दागिने, मनमोहक चित्रे, हस्तकलेच्या सुंदर वस्तू,गृहसजावटीच्या वस्तू आदींचा देखील या प्रदर्शनामध्ये समावेश असणार आहे. विशेष म्हणजे या प्रदर्शनात हातमाग व विणकाम क्षेत्रातल्या राष्ट्रीय पुरस्कार पटकवलेल्या विजेत्या कारागिरांचा सहभाग आहे. भारतीय परंपरेचा ठेवा जपणाऱ्या या कलेला जगापुढे आणण्यासाठी व या क्षेत्रातल्या होतकरु कलाकारांना एकत्र आणून हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आर्ट एक्स्पो सातत्याने कार्यरत आहे. इतकंच नव्हे तर ह्या प्रदर्शनासाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. कलेची आवड असणाऱ्या व नवनवीन आकर्षक वस्तूंची खरेदी करु पाहणाऱ्या चाहत्यांसाठी हे प्रदर्शन पर्वणीच ठरेल.नुकतेच या कार्यक्रमाचा शुभारंभ झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येउ द्या’ फेम ‘श्रेया बुगडे’ यांच्या हस्ते झाला . यावेळी जर तुम्हाला एकाच छताखाली भारतीय संस्कृतीची विविध रूपे पहायची असतील तर या प्रदर्शनाला नक्की भेट द्या असे श्रेया बुगडे म्हणाली.

ज्या व्यक्तीस भारतीय कलेचा अभिमान असेल आणि कलेविषयी अभिजात सौंदर्य असेल त्यांनी एकदा तरी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आर्ट एक्स्पोच्या संचालिका उज्वल सामंत यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

माधुरी दीक्षित बनविणार मराठी चित्रपट

News Desk

जे खोटे आहे ते खोटेच आहे

Gauri Tilekar

Kargil Vijay Diwas : जाणून घ्या… कारगिल युद्धाची कारणे

News Desk
राजकारण

उध्दव ठाकरेंच्या सभेला उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनाची ना !

News Desk

मुंबई | शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. उध्दव ठाकरे हे गुरुवारी(२२ नोव्हेंबर)ला सकाळी शिवनेरी गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपस्पर्शानं पावन झालेली माती घेउन २४ नोव्हेंबरला अयोध्येला पोहचणार आहे. मात्र त्यांच्या नियोजित सभेला उत्तर प्रदेश पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

अयोध्या येथील राम कथा पार्क इथं उध्दव ठाकरे सभा घेणार होते. परंतु ही जागा वादग्रस्त असून याजागेच्या जवळच राम मंदिर आणि बाबरी मस्जिदही आहे त्यामुळे एखाद्या विधानामुळे याठीकाणी वाद निर्माण होऊ शकतो. म्हणून उत्तरप्रदेश पोलीसांनी त्याला नकार दिला आहे.

उत्तरप्रदेश पोलिसांकडून आम्ही सभेसाठी परवानगीच मागितली नाही. अयोध्या काही पाकिस्तानात नाही, त्यामुळे सभेला परवानगी कशाला मागायाची गरजच नाही असे राऊत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे शरयू नदीच्या किनाऱ्यावर आरती करणार आहे. शरयू नदीवर कार्यक्रम आटोपल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहोत असं राऊत यांनी सांगितलं होतं

Related posts

मराठा आरक्षणासाठी राजीनामा देईन

News Desk

कॉंग्रेसने जनतेला मुर्ख बनविले

News Desk

आता मोदी राफेल घोटाळ्यातून कमावलेल्या पैशाने आमदार विकत घेत आहेत !

News Desk