HW News Marathi
मनोरंजन

संगीत सम्राट पर्व २चा विजेता आज ठरणार

मुंबई | संगीत सम्राट पर्व २ या झी युवा वाहिनीवरील अनोख्या संगीतमय कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर संगीताची मोहिनी घातली आहे. बुधवार ते शुक्रवारी रात्री ९:३० वाजता सुरु होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला आहे. घराघरामध्ये हा कार्यक्रम सध्या पाहिला जातो. सूर, लय आणि ताल यांचा सुरेख संगम संगीत सम्राट या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राला पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या संगीत परंपरेचा मोठा वारसा झी युवा या वाहिनीने संगीत सम्राट या कार्यक्रमाद्वारे जपलेला पहायला मिळत आहे.

महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले अनेक गायक, वादक आणि ज्यांच्या श्वासात संगीत आहे अशा अनेक कलावंतानी संगीत सम्राटाच्या व्यासपीठाद्वारे मराठी रसिक प्रेक्षकांसमोर त्यांची कला सादर केली. महाराष्ट्रातील आघाडीचे गायक आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडे यांनी सूर, ताल आणि लय या मुद्द्यांद्वारे स्पर्धकांचे परीक्षण केले तर आपल्या चार कॅप्टन्सच्या चार टीम्स म्हणजेच सावनी रवींद्रची नादमधुर सह्याद्री, जुईली जोगळेकरची स्वरमयी कोकण, राहुल सक्सेनाची सुरसाज विदर्भ आणि अभिजीत कोसंबीची लयदार मराठवाडा यांच्यात ही चुरस रंगल्याचे पहायला मिळाले.

परीक्षकांनी सुद्धा संगीत सम्राटची उत्कंठा वाढविण्यासाठी नियमात फेरबदल करून चार ऐवजी सहा फायनलिस्ट ठेवले आहेत. त्याचबरोबर आनंद शिंदे आणि वैशाली सामंत हे दोन महाराष्ट्राचे आवडते गायक यांनी सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षण केले. संगीत सम्राट २ साठी कोकण कन्या, हरगुण कौर, जिज्ञेश वझे, फोक रिवाईवल, कैवल्य केसकर आणि संकेत बार्डिया या सहा स्पर्धकांमध्ये ही चुरस होणार आहे. या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ट्विटरचे गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने स्पेशल इमोजी

swarit

सनीला हवाय मुलगाच…

News Desk

एसटीएफने ऊधळला सलमानच्या हत्येचा कट

News Desk
महाराष्ट्र

कल्याणमधून 7 नक्षवाद्याना अटक, भीमा कोरेगाव प्रकरणात सामिल?

swarit

कोरेगाव-भीमा हिंसाचारात हात? कल्याणमधून अटक करण्यात आलेल्या 7 नक्षलवाद्यांवर संशय

राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी कल्याणमधून ७ नक्षलवाद्यांना अटक केली. ते मूळचे तेलंगणाचे रहिवासी असून त्यांना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. कोरेगाव – भीमा घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये झालेल्या हिंसाचारात त्यांचा सहभाग असल्याचा संशय

Related posts

सचिन वाझेंच्या चौकशीसाठी CBIला दिली परवानगी

News Desk

ऑपरेशन क्लिनअप – भाग २ सुरू ! पोलीस आयुक्त हेमंत नगराळे ‘ऍक्शन मोड’मध्ये

News Desk

अनिल देशमुखांना आणखी एक धक्का, ED ने टाकली निकटवर्तीयाच्या घरावर धाड

News Desk