HW News Marathi
मनोरंजन

#HappyBirthdayLataDi | लतादीदी आयुष्यभर का राहिल्या अविवाहित ?

गौरी टिळेकर | गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आयुष्यात सर्व काही कमावले. लतादीदींच्या स्वरांनी जग जिंकले. त्यांच्याकडे नाव-लौकिक, सन्मान, आदर, धनसंपत्ती असे सर्व काही आहे. माध्यमांकडून लतादीदींना कायमच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही ठराविक प्रश्न विचारले गेले. त्यापैकी एक म्हणजे “लतादीदी, तुम्ही लग्न का केले नाही?” लतादीदींवर त्यांच्या सर्व भावंडांची जबाबदारी होती. म्हणूनच त्यांनी कधी वैयक्तिक सुखाचा विचार केला नाही. त्यांच्यापुढे कामाचा व्याप मोठा होता त्यामुळे त्यांनी स्वतःच्या लग्नाचा विचार केला नाही. पण यासोबतच आणखी एक कारण आहे की ज्यामुळे लतादीदींनी आयुष्यभर लग्न केले नाही.

असे म्हणतात की, डुंगरपूर राजघराण्याचे महाराज राज सिंह यांच्यावर लतादीदींचे प्रेम होते. हृदयनाथ मंगेशकर आणि महाराज राज सिंह हे एकमेकांचे चांगले मित्र होते. राज हे कायदेविषयक शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आले तेव्हा त्यांची मैत्री झाली. ते एकत्र क्रिकेट खेळत असत. पुढे त्यानिमित्ताने हृदयनाथ मंगेशकर यांच्या घरी राज यांचे येणे जाणे होत असते. त्यामुळे लतादीदी आणि राज यांची मैत्री झाली. आणि पुढे या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. एव्हाना लतादीदींच्या गाण्यांमुळे त्या सर्वपरिचित झालेल्या होत्या. त्यामुळे माध्यमांनीदेखील त्यांना याबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली होती.

असे म्हटले जाते की, राज आणि लतादीदी या दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचे होते. परंतु हे लग्न कधीही होऊ शकले नाही. कारण राज यांनी त्यांच्या आई-वडिलांना असे वचन दिले होते की, ‘ते कोणत्याही सामान्य कुटुंबातल्या मुलीशी लग्न करणार नाहीत.’ पुढे लतादिदींप्रमाणेच राज यांनीदेखील लग्न केले नाही. ते अविवाहितच राहिले.

राजसिंह यांना क्रिकेटची प्रचंड आवड होती. पुढे त्यांचे बीबीसीआय सोबत देखील संबंध आले. लतादीदींना देखील क्रिकेटची प्रचंड आवड आहे. असे म्हटले जाते की, राज यांच्या खिशात एक छोटा टेपरेकॉर्डर कायम असे आणि त्यात केवळ लतादीदींची काही निवडक गाणी असत. राजसिंह यांनी आपल्या आई-वडिलांना दिलेल्या वचनामुळे लतादीदींशी लग्न करता आले नाही, असे म्हटले जात असले तरी लतादीदींनी कधीही याविषयावर कोणतेही भाष्य केलेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

 नाना पाटेकर शहिदांच्या कुटुंबियांना मदत करणार

News Desk

सरकारने आमचा अपमान केला – प्रसाद ओक

swarit

#KaderKhan : सिनेसृष्टीतील अष्टपैलू कलाकार गमावला | विनोद तावडे

News Desk
मनोरंजन

#HappyBirthdayLataDi |… या सिनेमातून गाळली लता दीदींची गाणी

swarit

अपर्णा गोतपागर | गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टंबर १९२९ रोजी इंदुर येथे झाला. लता यांचे वडिल पंडित दिनानाथ मंगेशकर हे स्वता: मराठी नाट्यसृष्टीतील अतिशय प्रसिद्ध गायक-नट होते. लता दीदी या दिनानाथ यांच्या ज्येष्ठ अपत्य. दिनानाथ आणि माई यांना लता, उषा, मीना, आशा या चार कन्या आणि हृदयनाथ हा मुलगा अशी पाच अपत्ये झाली.

लता दीदी यांना वडिल पंडित दिनानाथ संगीत क्षेत्रातील पहिले गुरु म्हणून लाभले. यानंतर दीदींच्या संगीत शिक्षणाला वयाच्या पाचव्या वर्षी सुरुवात झाल्याचे म्हटले जाते. दीदींनी वडिलांच्या संगीत नाटकांत बाल-कलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. वडिलांकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवता-गिरवात दीदींचे बालपण केले. दीदी १३ वर्षांच्या असताना वडील दीनानाथ यांचे १९४२ साली निधन झाले.

वडिलांच्या जाण्याने घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. ज्येष्ठ अपत्य असल्याने माई (आई) आणि चार भांवडे यांचे पालपोषण करण्याची जबाबदारी दीदींवर पडली. वडिलांच्या निधनानंतर दीनानाथ मंगेशकर यांचे वडीलांचे मित्र आणि नवयुक चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी) यांनी लता मंगेशकर यांनी मंगेशकर कुटुंबाची मदत केली.

दिदींचे सिनेसृष्टीतील पदार्पण

लता दीदींनी १९४२मध्ये प्रदर्शित झालेला ‘पहिली मंगळागौर’ या सिनेमात त्यांनी छोटी भुमिका करुन अभिनय केला. या सिनेमात दीदींनी ‘नटली चैत्राची नवलाई’ हे गीत आणि अभिनयाची जादु दाखविली. दीदींनी १९४२ ते १९४८ मध्ये मराठीसोबत हिंदी अशा आठ सिनेमात कामे केली.

या सिनेमातून दीदींची गाणी गाळली

लतादीदींच्या गण्याची सुरुवात मराठी सिनेमातून झाली आहे. लतादीदींनी १९४२मध्ये प्रदर्शित झालेला ‘किती हासाल’ या मराठी सिनेमातील नाचे या गडे, खेळ सारी, मनी हौस भारी हे गाणे गायली होते. परंतु दीदींनी गायलेली ही सर्व गाणी सिनेमातून गाळण्यात आले. यानंतर दीदींनी माता एक सपूत की ‘दुनिया बदल दे तू हे हिंदी भाषेतील पहीले गाणे गजाभाऊ (१९४३) या मराठी चित्रपटासाठी गायले.

१९४५ साली मंगेशकर कुटुंब मास्टर विनायक यांच्यासोबत महाराष्ट्रात राहावयास आले. दीदींची सिनेमातील गाणी गाळण्यात आली तर त्या खचू न जाता. तितक्याच जिद्दीने पुन्हा उभ्या राहिल्या. आज त्या देशातील गानसम्राज्ञी म्हणून ख्याती असलेल्या लता दिदींनी गायनाच्या प्रति प्रचंड मेहनत घेतली आहे.

Related posts

बिग बींना ७६व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा….

Gauri Tilekar

महात्मा गांधींना नोबेल का मिळाला नाही ?

News Desk

‘थार’च्या वाळवंटात रंगणार ‘राग’स्थान’ महोत्सव!

swarit