HW News Marathi
मनोरंजन

नाट्यसंमेलनाचा फसलेला तीन दिवसीय प्रयोग

उस्मानाबाद । कुठलीही नाट्य परंपरा नाही. ना थिएटर ना सभागृह. एवढं कशाला साधा सिनेमा पाहण्यासाठी शेजारील बार्शी किंवा सोलापूरा जाण्याची नामुष्की ज्या जिल्ह्यातील नागरिकांवर येते तेथे नाट्य संमेलन भरून आयोजकांना स्वःचे हसू करून घेतला. तीन दिवस चाललेल्या नाट्य संमेलनाकडे स्थानिक नागरिक काही मोजकीच नाट्य मंडळीवगळत कोणीही फिरकले नाही. त्यामुळे उस्मानाबादला नाट्यसंमेलनाचा कशासाठी घाट घालण्यात आला, असा सवाल मनात घेऊनच रसिक मायबाप व कलावंतांनी तीन दिवस फसलेल्या 97 व्या नाट्यसंमेलनाचा शेवट केला.

खरं तर उस्मानाबादला नाट्य परंपरा नाही. नाट्यलेखक, कलावंत देखील येथून तयार झाल्याचे दिसत नाही. तरीही ग्रामीण भागातील तरुण या क्षेत्रात येण्याची स्वप्ने बाळगून आहेत किंवा त्या दिशेने धडपड करत आहेत, त्यांना या नाट्य संमेनातून मोठी उर्जा मिळेल, असे वाटत असताना नाट्य संमेलनाचे वगनाट्य झाले. दिग्गज कलावंतासह राजकीय व्यक्तिंनीही या संमेलनाकडे पाठ फिरवली. त्यामुळे हे संमेलन या भागात का घेतले असा प्रश्न पडतो. रविवारी संमेलनासाठी मराठवाड्यातील लेखक हजेरी लावण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पंरतु एकही कलावंत याकडे फिरकला देखील नाही.

काही मोजक्या हौसी राजकीय व्यक्तिने हा सर्व खटाटोप केल्याचे या फसलेल्या प्रयोगावरून म्हणावे लागेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऋषी कपूर यांच्या निधनाने निखळ आनंद देणारे हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार व्यक्तीमत्वे हरपले !

News Desk

‘भाई’ चित्रपटाला स्क्रिन न मिळणे हे दुर्दैव

News Desk

‘पीएम नरेंद्र मोदी’च्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाची स्थगिती

News Desk