HW News Marathi
मनोरंजन

नितेश राणेंकडून लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांची पाठराखण

मुंबई | लालबागचा राजा गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांमध्ये धक्का झाल्याचा प्रकार मंगळवारी घडल्याचे पहायला मिळाले. या प्रकाराचा सोशल मिडीयावर अनेकांनी निषेध देखील नोंदविला. लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी करत पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार कॅमे-यात कैद झाला आहे. असे असताना आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणात मंडळाच्या कार्यकर्त्यांची बाजू घेतली आहे.

लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांना उगाच बदनाम करण्यापेक्षा दुसरी बाजूही ऐकली पाहिजे. पोलिस ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना हाताळत आणि मारत आहेत ते चुकीचं आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. लालबागचा राजा पोलिसांचा का स्थानिक कार्यकर्त्यांचा हे कळले नाही आहे? उगाच मंडळाची होणारी बदनामी थांबली पाहिजे, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शाहरुखला भेटता आले नाही म्हणून फॅनने स्वतःवर केले ब्लेडने वार

News Desk

दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना ऐतिहासिक यश !

News Desk

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ट्वीटरवर मराठीसह १० प्रदेशिक भाषेतील विशेष हॅशटॅग

News Desk
मुंबई

लक्ष्यवेधचा ३६ वा “लक्षसिध्दी सोहळा” दिमाखात संपन्न

News Desk

मुंबई | लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप ऍण्ड एक्सलन्स या संस्थेने ३६ व्या लक्षसिध्दी सोहळ्याचे आयोजन केले होते. नुकताच हा लक्षवेध चा “लक्षसिध्दी सोहळा” मैसुर असोसिएशन सभागृह माटुंगा येथे पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून एनएसडीएल (NSDL) या संस्थेचे उपाध्यक्ष मनोज साठे हे उपस्थित होते. या लक्षसिध्दी सोहळ्यामध्ये लक्षवेध संस्थेचे सर्वेसर्वा अतुल राजोळी यांनी मनोज साठे यांच्या सोबत “समृद्धीचा राजमार्ग” ह्या विषयावरील चर्चासत्र घेतले. यावेळी त्यांनी उद्योजकांच्या मनातील प्रश्न त्यांना विचारले.

“आयुष्यात तुम्ही किती पैसे कमावता ही गोष्ट महत्वाची नसते. समृद्धीचा राजमार्ग जर तुम्हाला मिळवायचा असेल तर “वा, वा, वा, वा” या तत्वाला आत्मसात करा. ह्या तत्वामधील पहिला ‘वा’ म्हणजे तुम्ही कमवलेले पैसे वाचवायला शिका, दुसरा ‘वा’ म्हणजे वाढ तुम्ही कमवलेले पैसे काही प्रमाणात गुंतवा जेणे करून त्यामध्ये वाढ होईल. तिसरा ‘वा’ म्हणजे पैश्यांचा वापर करा जेणे करून अर्थव्यवस्था प्रवाहात राहील आणि चौथा शेवटचा ‘वा’ म्हणजे पैसे वाटायला शिका तुमच्या कडील अधिक पैसे गरजू व्यक्तींमध्ये किंवा सामाजिक कार्यासाठी त्याचा वापर करा . हे तत्व तुम्ही पाळलेत तर यश नक्कीच तुमचे होईल’’ असे बहुमूल्य मार्गदर्शन मनोज साठे यांनी ३६ व्या लक्षसिध्दी सोहळ्यामध्ये उद्योजकांना केले.

व्यावसायिकांना दिग्गज वक्त्यांकडून मार्गदर्शन मिळावे आणि त्यांची व्यावसायिक वृद्धी व्हावी म्हणूनलक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप ऍण्ड एक्सलन्स असे परिसंवाद घेत राहील असे लक्षवेध चे संस्थापक अतुल राजोळी यांनी सांगितले. ३६ व्या लक्षसिध्दी सोहळ्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

 

Related posts

बाप्पाच्या दर्शनापासून भाविक पाच दिवस वंचित

News Desk

पनवेल महापालिकेच्या आशिर्वादाने रहिवाशी त्रस्त

News Desk

पती पत्नीसह नऊ जणांना अटक, घरगुती वादात केली कारवाई

News Desk