HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

भाजप-शिवसेनेमध्ये निवडणुकीसाठी जागांची होणार अदलाबदली | सूत्र

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप युतीच्या जागावाटपावरून चर्चा सुरू आहेत. सध्या दोन्ही पक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक दिग्गज नेते प्रवेश करत आहेत. नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांना निवडणुकीसाठी मतदारसंघ देण्यासाठी दोन्ही पक्षांकडून तडजोड करण्याचे प्रयत्न सुरू असून शिवसेना आणि भाजपमध्ये २० ते २५ जागांमध्ये अदलाबदली होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी यांच्या आधारे यंदाच्या निवडणुकीत मतदारसंघात अदलाबदली करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतेच भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेच्या आधारे काही ठिकाणी शिवसेनेची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे या जागा घेण्यासाठी भाजप उत्सूक असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, अदलाबदल होणाऱ्या जागांमध्ये मुंबईच्या ४ ते ५ जागांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अंतिम जागावाटपांचे सूत्र काय ठरणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

अकोलेचे आमदार वैभव पिचड यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ही जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. तर उस्मानाबादच्या कळंबचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या भाजप प्रवेशामुळे हा मतदारसंघदेखील भाजपला मिळू शकते. गोरेगावचा मतदारसंघ भाजपाकडून शिवसेनेसाठी सोडला जाऊ शकतो. २०१४ मध्ये भाजपच्या विद्या ठाकूर यांनी शिवसेनेच्या सुभाष देसाईंचा पराभव केला होता. मात्र ही जागा भाजपकडून सोडली जाऊ शकते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहांच्या उपस्थितीत मातब्बर नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

राष्ट्रवादीला धक्का, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भाजप प्रवेश निश्‍चित

News Desk

शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप

News Desk