HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात

मुंबई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेचे दोन टप्पे पूर्ण झाले. त्यानंतर आता महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून (१३ सप्टेंबर) सुरुवात होणार आहे. ही महाजनादेश यात्रा आज (१३ सप्टेंबर) ते गुरुवार (१९ सप्टेंबरझ या कालावधी दरम्यान तिसरा टप्पा पार पडणार आहे. या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील अकोला येथून प्रारंभ आहे. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात ही यात्रा १३ जिल्ह्यांतील ६० विधानसभा मतदारसंघांतून १,५२८ कि. मी. प्रवास करणार आहे.

दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप सोहळा पार पडणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस व महाजनादेश यात्रा प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. सुजितसिंह ठाकूर यांनी पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेस पहिल्या व दुस-या टप्प्यात जनतेकडून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. यात युवक, महिला, मुस्लिम महिला व ग्रामीण भागात शेतकरी यांचा सहभागी झाले होते. यापूर्वी दोन टप्प्यांत महाजनादेश यात्रेचा राज्यातील २४ जिल्ह्यांतून १०६ विधानसभा मतदारसंघांतून २२०८ कि.मी. प्रवास झाला. आपल्या सरकारच्या पाच वर्षांच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर जाऊन मांडणारे फडणवीस हे राज्यातील पहिले मुख्यमंत्री आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावेळी पंतप्रधान मोदी ‘या’ कारणामुळे अनुपस्थित

News Desk

काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्याला शिवसैनिकांचा विरोध

News Desk

बारामती देशात अव्वल म्हणून ती सर्वांना हवीहवीशी वाटते !

News Desk