HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जमाफीनंतर आत्महत्या थांबतील, असा लेखी प्रस्ताव द्या – दानवे

शिर्डी – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. त्यात आता शेतकरी आत्महत्येच्या मुद्यानं भर घातली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबणार असतील, तर सर्व विरोधकांनी एकत्र यावे आणि त्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असे आश्चर्यकारक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष – खासदार रावसाहेब दानवे यांनी शिर्डीत केले आहे.

कर्ज माफ करुन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत असतील, तर यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावं, राजकीय जोडे बाहेर काढावे, आणि या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, अशाप्रकारचा ठोस प्रस्ताव द्यावा, मग त्यावर सरकार विचार करेल” असे दानवे म्हणाले.. याशिवाय “आमच्यावर काय आरोप होत आहेत, याची आम्हाला चिंता नाही. आमचं लक्ष पायाभूत सुविधांवर आहे”, असेही दानवे यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या बनावट आवाजाची एक क्लिप व्हायरल

News Desk

स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनाही पीपीई किट देण्यात यावी !

News Desk

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा, काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Aprna