HW News Marathi
महाराष्ट्र

कल्पना गिरी खून प्रकरणातील आरोपीचे कुटुंबिय करणार उपोषण

रामदास पांडेवाड

लातूर – कल्पना गिरी खून प्रकरणातील आरोपी महेंद्रसिंह चौहान याची नार्को, पाॅलीग्राफीक आणि ब्रेनमॅपिंग चाचणीची मागणी मान्य न झाल्यास 26 जानेवारी 2017 संपूर्ण चौहान कुटुंबिय उपोषण सुरू करणार असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

आरोपी महेंद्रसिंह चौहान याने स्वतः मृत कल्पना गिरी यांच्या कुटुंबियांनीही आरोपी महेंद्रसिंह चौहानची नार्को , पाॅलीग्राफीक आणि ब्रेनमॅपिंग चाचणी करण्याची मागणी जिल्हा न्यायालयाकडे केली आहे. त्यानुसार आरोपीच्या वैद्यकीय चाचण्या न घेतल्यास 26 जानेवारी 2017 पासून उपोषणाला बसणार असल्याचे आरोपी महेंद्रसिंह चौहान याच्या कुटुंबियांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘केवळ राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवरच पंतप्रधानांसोबत चर्चा’, शरद पवार!

News Desk

माजी मुख्यमंत्र्यांचा आजी मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊनबद्दल दिला ‘हा’ सल्ला

News Desk

“…तर तुरुंगात बसून एसटीपण चालवू शकतील”, भाजपचा अनिल परबांना टोला

News Desk
मुंबई

सेंट झेवियर्समध्ये ‘आमोद’ची ‘पखरण’

News Desk

मराठी वाङ्मय मंडळाच्या दिमाखदार महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई – १९२३मध्ये स्थापन झालेल्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचे यंदा ९३वे वर्ष. या वर्षात मंडळाने अनेक उपक्रम राबवले. त्यात झेवियर्स महाविद्यालयामध्ये १९,२० आणि २१ जानेवारी रोजी झालेला आमोद हा आंतरमहाविद्यालयीन महोत्सव विशेष उल्लेखनीय ठरला. या दिमाखदार महोत्सवाला विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मराठी वाङ्मय मंडळ आयोजित या महोत्सवात एकूण दहा स्पर्धा रंगल्या. विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी यात आपली कलाकारी सादर केली. आमोदचे यंदाचे ५वे वर्ष होते. त्याचे मुख्य ठरले स्पर्धांमधली विविधता. ललित कला अंतर्गत पोस्टरबाजी आणि कार्टून फॅक्टरी तसेच साहित्य कला अंतर्गत काव्य नाटुकली या नव्या स्पर्धा होत्या. त्यामुळे त्यांबद्दल विशेष उत्सुकता दिसली. ब. न. पुरंदरे वक्तृत्व स्पर्धा म्हणजे आमोदचे विशेष वैशिष्ट्य. या स्पर्धेच्या विजेत्यांना चांदीचा फिरता चषक देण्यात येतो. यंदा हा मान टी. एम. लॉ कॉलेजने पटकावला. महाराष्ट्राची लोकधारा या लोकनृत्य स्पर्धेत स्पर्धक संघांनी बहारदार सादरीकरणे केली. स्पर्धांतला हा उत्साह पारितोषक वितरण समारंभातही कायम होता. आपआपल्या कॉलेजच्या विजेत्यांना चिअर अप करण्यासाठी एकच जयघोष सुरू होता.

या वर्षी आमोदमधील सर्वच स्पर्धा चुरशीच्या झाल्या. सर्वच कॉलेजांनी अव्वल क्रमांकासाठी मेहनत घेतली. एकपात्री अभिनय आणि वक्तृत्व स्पर्धेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला.

आमोदच्या निमित्ताने मराठी वाङ्मय मंडळ च्या वार्षिक अंक ‘पखरण’चेही प्रकाशन झाले. या अंकामध्ये झेवियर्सच्या स्टाफ आणि विद्यार्थ्यांचे लेख असून त्यांच्या लेखन कौशल्याला वाव देणारा हा उपक्रम होता.

Related posts

फिलिपिन्सच्या ‘त्या’ नागरिकाचा मृत्यू कोरोनामूळे झाला नव्हताच…

swarit

निवडणुक खर्चावर मर्यादा

News Desk

मुंबई क्रिकेट असोसिएशनने पोलीस बंदोबस्ताचे १३.४२ कोटी थकविले

swarit