HW News Marathi
महाराष्ट्र

निर्बूद्ध नागरिकंचा मोर्चा

नाशिक : अधिक व्याजाचे अमिष दाखवून लोखा गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या मैत्रेय सिव्हर्सेसच्या सर्व कंपन्यांची मालमत्ता विक्री करून आमची रक्कम परत करण्याची मागणी करत अनेक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना यावेळी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. दरम्यान, आंदोलकांची संख्या इतकी होती की, त्यामुळे नाशिकमधील मुख्य मार्गावर तीन तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली. या निमित्ताने नाशिकमधील मालदार नागरिक अंधपणे कुठेही पैसा गुंतवताता, धोक्याबाबत कुठलही काळजी घेत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आह

मैत्रेयच्या गुंतवणूकदारांना परतावा नेमका केव्हा व किती दिला जाईल याचा आराखडा जाहीर करावा अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांची होती़ मैत्रेयमध्ये महाराष्ट्र तसेच राज्याबाहेरील २७ लाखापेक्षा अधिक गुंतवणुकदारांचे २८०० कोटी रुपये अडकून पडले आहेत़ ५ फेबु्रवारी २०१६ पासून कंपनी बंद पडली असून गुंतवणूकदारांना परतावा दिलेला नाही़ मैत्रेयसंदर्भात शासन काय कारवाई करते याची माहिती मिळावी अशी मागणी असोसिएशनचे गोपाल बडगुजर , सचिन अमृतकर , रविंद्र सुतार , चतुर देसले यांनी खेडकर यांच्याकडे केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटणार नाही, राजस्थानची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार नाही – जयंत पाटील

News Desk

राज्याच्या सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू; कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

Aprna

शिक्षकाने केला पत्नीचा खून

News Desk
मुंबई

  विश्वजीत कदम, उद्योजक अविनाथ भोसलेंच्या घरावर आयकर विभागाचा छापा

News Desk

वृत्तसंस्थाः काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि उद्योजक अविनाश भोसलेंच्या या दोघांच्याही निवासस्थान आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापा घातला आहे. माजी वनमंत्री पतंगराव कदम यांचे सुपुत्र असलेले विश्वजीत कदम हे उद्योजक अविनाश भोसले यांचे जावई आहेत. छापेमारी कोणत्या कारणाने झाली आहे, याबाबत अस्पष्टता आहे. अधिकारी सध्या तपासणी करत आहेत. सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे.

अविनाश भोसले यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन काढून घेतले आहेत. अशीच तपासणी विश्वजीत कदम यांच्या कार्यालयातही सुरु आहे. अविनाश भोसले आणि विश्वजीत कदम यांच्या कोण-कोणत्या कार्यालयांवर छापेमारी झाली आहे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. छापेमारी कोणत्या कारणाने झाली आहे, याबाबतही अस्पष्टता आहे.

Related posts

यंदाचा मुंबई श्री किताब परेळच्या अनिल बीलावाने पटकावला

News Desk

सापाने देखील केला लोकलमधून प्रवास

swarit

डॉक्टरावर कोयत्याने हल्ला

News Desk