HW News Marathi
महाराष्ट्र

महिलेवर सामूहिक बलात्कार , दोघाना अटक

गौतम वाघ

उल्हासनगर : पैसे देण्याच्या बहाण्यानं महिलेला घरी बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना कल्याण तालुक्यातल्या द्वारली गावात घडलीये. धक्कदायक बाब म्हणजे बलात्कार करणारे दोन्ही आरोपी मुंबईच्या बेस्ट बसचे चालक असून उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

सुनील मोरे आणि अरविंद कुंभार अशी असून हे दोघंही पीडित महिलेच्या पतीचे मित्र आहेत. यापैकी सुनील मोरे याच्याकडे पीडित महिलेच्या पतीनं १० हजार रुपये उसने मागितले होते. हे पैसे घेण्यासाठी मोरे यानं मित्राच्या बायकोला बुधवारी त्याच्या द्वारली पाड्यातील घरी बोलावलं आणि तिथे तिच्यावर मोरेसह अरविंद कुंभारनेही बलात्कार केला. या सगळ्या प्रकाराचं त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरणही केलं. यानंतर पीडितेनं शुक्रवारी अरविंद कुंभार याचा हा मोबाईल मिळवला आणि थेट पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी या दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अंत्योदयाची संकल्पना सर्वसामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी प्रतोदचा विशेषांक महत्त्वपुर्ण -अर्थमंत्री मुनगंटीवार

News Desk

सीमावासियांच्या पाठिशी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

राज्यात ५ जिल्ह्यादरम्यान विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय  

News Desk
देश / विदेश

संघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही | डॉ. भागवत

News Desk

मुंबई | दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तीन दिवसीय शिबीर पार पडले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकार आणि काँग्रेस सरकारवर निशाना साधला. या दरम्यान, भागवत यांनी देशाच्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले.

शिबीराच्या शेवटच्या दिवशी मोहन भागवत यांनी केंद्र सरकारसह विरोधी पक्षाला उद्देशून एक प्रश्न उपस्थित केला की राजकारणात स्मशान, कब्रस्तान , भगवा आतंकवाद यांसारख्या शब्दांना कशा प्रकारे पाहिले जाते ? यावर उत्तर देताना भागवत म्हणाले, राजकारण हे लोक कल्याणासाठी व्हायला हवे .स्मशान, कब्रस्तान , भगवा आतंकवाद यांसाठी नाही.

पुढे बोलताना भागवत म्हणाले, जेव्हा राजकारणाचा मुख्य उद्देश केवळ सत्ता प्राप्ती असा होतो. तेव्हा ख-या अर्थाने विविध विषयांवर राजकीय पक्ष राजकारण करु लागतात. यावेळी महात्मा गांधी आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा दाखला देत भागवत म्हणाले त्यांच्यासारखे काम केले तर अशा गोष्टींना वाव मिळणार नाही. तसेच पुढे बोलताना भागवत म्हणाले, संघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही.

संघाचे मुख्य उद्दिष्ट केवळ नियमांचे पालन करणे हा आहे. लोक संघाच्या धोरणांचा फायदा घेतात. बुधवारी, संघाच्या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी मोहन भागवत यांनी सांगितले की संघ अनुच्छेद 370 आणि 35 ए स्वीकारत नाही. त्यांनी सांगितले की अशी व्यवस्था योग्य नाही.

 

Related posts

पंतप्रधान मोदी आणि नथुराम गोडसे यांची विचारसरणी एकसारखीच !

swarit

मोठी बातमी! भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

News Desk

स्वदेशी ‘तेजस’ विमानातून लष्कर प्रमुखांचे उड्डाण

News Desk