HW News Marathi
महाराष्ट्र

वंचित शेतकऱ्यांनाही पीक विमा योजनेचा लाभ द्या!: विखे पाटील

मुंबई,दुष्काळाने होरपळलेल्या अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात पीक विमा योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सदरहू योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींची तातडीने बैठक बोलवावी, असे निर्देश आज विधानसभेत सरकारला देण्यात आले.

काँग्रेसने हा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी निर्माण होत असलेल्या अडचणी सभागृहात विषद केल्या. या योजनेसाठी सरकारने जाचक नियम आणि अटी घातल्याने अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, ही बाब त्यांनी महसूलमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.

राज्यात मागील २-३ वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. त्यात अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले, ही वस्तुस्थिती आहे. कमांड क्षेत्रातील शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळणार नाही, हा नियम केल्याने बहुतांश शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अट तातडीने काढून टाकावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली. याच अनुषंगाने विधानसभेतील इतर आमदारांनी पीक विमा योजनेबाबत केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन याबाबत तातडीने बैठक बोलावून निर्णय करण्याबाबतचे निर्देश अध्यक्षांनी सरकारला दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“जगासमोर आणखी एक संकट” तर WHO ने दिला ईशारा!

News Desk

“…अॅमेझॉनचे पार्सल परत पाठवले”, उद्धव ठाकरेंचा भगतसिंग कोश्यारींना टोला

Aprna

‘हल्ली मी कोणत्याही कारणाने दिल्लीत गेलो तर त्याची पतंगबाजी होते’ – देवेंद्र फडणवीस

Ruchita Chowdhary
देश / विदेश

बिहारमध्ये राजकीय भूकंप

News Desk

नवी दिल्ली: बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. जेडीयूच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपाल के. एन. त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. इतकेच नाही तर मोदींनी त्यांना भाजपमध्ये येण्याची आॅफरही दिली आहे. भ्रष्टाचाराशी आपण एकत्र लढू असेही मोदींनी म्हटले आहे.

तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपद न सोडण्यावर ठाम आहेत. आरोप असलेल्या मंत्र्यांसोबत काम करणे अशक्य असल्याचे नितिशकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले आहे. बिहारच्या हितासाठी आपण काहीही करायला तयार आहे.

बिहारमधील जेडीयू-आरजेडी-काँग्रेस महायुती अवघ्या २० महिन्यांत तुटली आहे. लालू प्रसाद यादव यांनी ही चर्चा वायफळ असल्याचे म्हटले होते. महाआघाडी तुटण्याचा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले होते.

‘नितीशकुमारांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितलेला नाही. या प्रकरणात मीडियालाच अधिक स्वारस्य आहे. नितीशकुमार आमचे नेते आहेत. ‘महाआघाडीत फूट’ या मीडियातून पसरवल्या जाणाºया अफवा आहेत.’, असे लालूंनी काही वेळेपूर्वी म्हटले होते.

राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर लालू यादव म्हणाले, ‘बिहार सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. महाआघाडीत काहीही चलबिचल नाही. सगळ्या मीडियाच्या अफवा आहेत. नितीशकुमारांनी तेजस्वींचा राजीनामा मागितलेला नाही.’ तेजस्वी यादवही म्हणाले की मला कधीही राजीनामा मागितला गेला नाही. नितीशकुमारांनीही आज आमदारांची बैठक बोलावली आहे. लालू यादव व त्यांच्या कुटुंबावर रेल्वे निविदा घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तेजस्वी यादवांच्या राजीनाम्याची भाजपने मागणी केली होती. जेडीयूचे म्हणणे होते की तेजस्वी यांनी जनतेसमोर स्पष्टीकरण द्यावे.

Related posts

आयकर अधिकाऱ्याच्या घरातून साडेतीन कोटीची रोकड जप्त

News Desk

मराठा आरक्षण | ५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथील करा, राज्य सरकारची मोदींकडे मागणी

News Desk

आयएनएस विक्रांतचे जलावतरण छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन! – मुख्यमंत्री

Aprna