HW News Marathi
महाराष्ट्र

वाशिम जिल्ह्यात उघड्यावर शौचास बसल्यास बॅड मार्निंग होईल  

विनोद तायडे

वाशिम – उघड्यावर शौचास बसणाऱ्या दोन ग्रामस्थांची सोमवारची सकाळ पोलीस ठाण्यात गेली. स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) अंतर्गत आज मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा, सनगाव आणि आसेगाव येथे प्रशासनाने कारवाई करत दोघा जणांना पकडले.

मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधाकारी महेश पाटील यांच्या नेतृत्वात जिल्यातील अनेक गावांमध्ये गुड माॅर्निंगची मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. आज दि 24 रोजी मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा येथील अशोक राठोड व सनगाव येथील सिताराम भगत अशा दोन युवकांना गुड मार्निंग पथकाने पकडले. त्यांना आसेगाव पोलीस स्टेशन मध्ये नेऊन समज देण्यात आली. यापुढे उघड्यावर शौचास न जाण्याचे व संडास बांधण्याचे लेखी जबाब नोंदवुन पोलीसांनी त्यांची सुटका केली. पथकामध्ये जिल्हा कक्षाचे उप मुकाअ महेश पाटील, अमित घुले,तालुका समन्वयक अभय तायडे यांची उपस्थिती होती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

परमबीर सिंग यांच्या इशाऱ्याने वाझेकडून खंडणी वसुली, कार डिझायनर दिलीप छाबरियांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

महडमध्ये प्रसादातून विषबाधा तीन बालकांचा मृत्यू

News Desk

शेतकऱ्यांची दिवाळी अखेर गोड – कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

News Desk
महाराष्ट्र

नांदेड-मुंबई विमानसेवा 1 मे पासून सुरू

News Desk

नांदेड – बहुचर्चित नांदेड-मुंबई-नांदेड विमानसेवा येत्या 1 मे पासून सुरू होणार आहे. देशाअंतर्गत विमानसेवेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंद पडलेल्या २४ विमानतळांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश दिले होते़ नांदेडसह सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, जळगाव या शहरातील विमानसेवांचा समावेश आहे़ नांदेडात ट्रुजेट या कंपनीकडून येत्या २७ एप्रिलपासून नांदेड-हैद्राबाद, तर १ मे पासून नांदेड-मुंबई विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे़

श्री गुरू गोविंदसिंगजी विमानतळावरून तब्बल सात वर्षानंतर पुन्हा विमानसेवा सुरू होणार असून २७ एप्रिलपासून नांदेडहून दररोज विमान उड्डाण करणार आहेत़ ट्रुजेट कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात येणार असून विमानतळावर अत्यावश्यक सोयीसुविधांची पाहणी केल्यानंतर त्यासाठी प्रशासनाने कंपनीला हिरवा कंदील दाखविला आहे.

 

Related posts

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता वाढण्यास प्रशिक्षण कार्यक्रम उपयुक्त – राजेश टोपे

News Desk

सत्ता ही विनयाने वापरायची असते !

News Desk

राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्याची १३ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त

Aprna